उद्रेक न्युज वृत्त :-मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.आज, शनिवार १६ मे रोजी मराठा समन्वयक समितीची बैठक पार पडली.या बैठकीनंतर जरांगे पाटील यांनी आंदोलनाची तारीख जाहीर केली आहे.येत्या,शनिवार ३० मे २०२६ रोजी जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी या त्यांच्या गावी ते उपोषणाला बसणार आहेत.३० मे पासून आपण आमरण उपोषण करणार आहे.तसेच राज्यभरात शांततेत आंदोलन करण्याची भूमिका त्यांनी जाहीर केली आहे.यामुळे आता सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.आंदोलन सुरू व्हायच्या आधी सरकारने आंदोलनाबाबत योग्य ती कार्यवाही करावी.एकदा आंदोलन छेडले तर पुन्हा माघार घेणार नाही आणि आपण कुणाचेही ऐकणार नाही,अशी थेट भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. सरकारने ३० तारखेच्या आत मराठा आरक्षणाबाबतच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात.३० तारखेनंतर सरकारसाठी वेळ वाढवून देणार नाही. सातारा,पुणे आणि कोल्हापूर संस्थानाचं गॅझेट सरकारने लागू करावे.तसेच मराठा आंदोलकांविरोधात दाखल केलेले गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत.सरकारने मराठा आरक्षणाबाबतची उपसमिती बरखास्त करावी,आरक्षणासाठी नवीन समिती स्थापन करा,हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राचे वाटप थांबले आहे.ते पुन्हा सुरू करा. ११९४ च्या धर्तीवरच आम्हाला जीआर हवा आहे. अन्यथा सरकारला गुडघ्यावर आणल्याशिवाय राहणार नाही,अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
एकदा आंदोलन छेडले तर पुन्हा माघार घेणार नाही; मनोज जरांगे पाटीलांची आंदोलनाची घोषणा..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

