Tuesday, September 8, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तउद्याला महाराष्ट्र बंदची हाक..!

उद्याला महाराष्ट्र बंदची हाक..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-देशाची राजधानी दिल्ली येथे सुरू असलेल्या नीट पेपरफुटी आंदोलन प्रकरणाला आता राजकीय वळण येऊ लागले आहे.विशेष म्हणजे, दिल्लीतील जंतर-मंतर आणि संसद परिसरात शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून झालेल्या अमानुष लाठीहल्ल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे.या पार्श्वभूमीवर प्रमुख राजकीय विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आणि पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी मैदानात उडी घेतल्याचे चित्र आहे.त्यानुसार,वंचित बहुजन आघाडीने उद्या,गुरुवार २३ जुलै रोजी ‘महाराष्ट्र बंद’ ची हाक दिली आहे.वंचितचे प्रमुख ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.त्यांनी राज्यातील सर्व समविचारी पक्ष,विद्यार्थी संघटना आणि समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांनी एकत्र येऊन ‘महाराष्ट्र बंद’ला पाठिंबा द्यावा,असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.शांततेच्या मार्गाने हक्क मागण्या करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करणे ही लोकशाहीची गळचेपी आहे.पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराचा निषेध म्हणून महाराष्ट्र बंद आंदोलन करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
  • विरोधी पक्षातील नेत्यांची उडी👇
काल मंगळवारी काँग्रेस नेते राहुल गांधी त्यांच्या खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाजवळ आंदोलनास बसले होते; तर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी देखील दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर पोहचून आंदोलकांशी चर्चा करत त्यांच्याकडून माहिती घेतली आणि अभिजीत दिपके यांच्याशी चर्चा करत विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीवर चिंता व्यक्त केली.त्यातच,आज बुधवारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आंदोलनस्थळी भेट दिली आणि सरकारवर टीकेची तोफ डागली.आपण पाहिलं की ज्या क्रूरपणे सरकारने विद्यार्थ्यांना वागणूक दिली आहे,हे काही लोकशाहीचं लक्षण नाही.या सरकारपेक्षा ब्रिटिश चांगले होते असं का म्हणत आहेत लोक? कारण जे सत्तेत आहेत त्यांच्या डोक्यात हवा गेली आहे.जनतेला ही हवा बरोबर काढता येते,असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.अश्यातच आता वंचित बहुजन आघाडीने विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आंदोलनात उडी मारल्याने जिकडून-तिकडून सरकारची कोंडी निर्माण झाली आहे. यावर सरकार काय भूमिका घेते,हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शासकीय शुल्काव्यतिरिक अतिरिक्त रकमेची मागणी; केवळ १५० रुपये घेतांना सेतू केंद्र चालकाला रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नागरिकांना वेळेत व तात्काळ शासकीय प्रमाणपत्रे मिळावीत,यासाठी ऑनलाईन सेतू केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.मात्र,काही सेतू केंद्र चालक मनमानी कारभार करून शासकीय...

गावाजवळच दर्जेदार शिक्षण; चार शाळा बनणार ‘मॉडेल शाळा’..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासीबहुल आणि दुर्गम एटापल्ली तालुक्यातील विद्यार्थ्यांना गावाजवळच आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि सर्वांगीण शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यातील चार शाळा ‘मॉडेल शाळा’...

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत; राज्यातील सर्व सहा विभागांना देणार प्रत्यक्ष भेटी.. – थेट संवादासह आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या ई-मेलवर...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत...

‘युजीसी-नेट’ परीक्षा केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात मनाई आदेश जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय परीक्षा एजन्सी(NTA),नवी दिल्ली यांच्यामार्फत आयोजित 'विद्यापीठ अनुदान आयोग-राष्ट्रीय पात्रता परीक्षा'(UGC-NET)जून-२०२६ ची परीक्षा गडचिरोली येथील शासकीय विज्ञान महाविद्यालय,चामोर्शी रोड,कन्नमवार नगर येथे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!