- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कोरची(गडचिरोली):-शेतकरी,युवक,महिला, व्यापारी, विद्यार्थी व इतर अशा अनेक गोर-गरीब, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांचे निराकरण तथा गाऱ्हाणी ऐकून प्रश्र्ने मार्गी लावण्याच्या उद्देशाने आरमोरी विधानसभा काँग्रेस कमिटी तर्फे ‘जनसंवाद परिवर्तन यात्रा’ गडचिरोली जिल्ह्याच्या कोरची तालुक्यातून सुरू करण्यात आली आहे.कोरची तालुक्यात काँग्रेस कमिटीचे कोरची तालुकाध्यक्ष मनोज अग्रवाल व तालुका काँग्रेस कमिटी कुरखेडाचे तालुकाध्यक्ष जीवन नाट यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू आहे.जनसंवाद परिवर्तन यात्रेच्या तिसऱ्या दिवशी कोरचीच्या मौजा-कोचीनारा ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कॉर्नर सभा आयोजित करण्यात आली.या सभेला आरमोरी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते रामदास मसराम यांनी ग्रामस्थांशी हितगुज साधत जनसंवादाद्वारे गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याचा आणि त्यावर उपाययोजना करण्याचा निर्धार केला.
प्रसंगी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष
रामसुराम काटेंगे,देसाईगंज पं.स.चे माजी सभापती परसराम टिकले,रूपराम देवांगन उपसरपंच कोचीनारा,कांताराम जमकातन ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ता,समशेर खान पठाण,रघुराम देवांगन लालदास देवांगन,किशोर कराडे,वामन नंदेश्वर, भीमराव कराडे,भगवाना सोनकुसरा,पंचराम जमकातन,सखीलाल बागडेहरिया व परिसरातील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
- Advertisement -

