- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-केंद्र सरकारच्या ॲग्रीस्टॅक या नव्या योजनेद्वारे देशातील सर्व जमीन मालक शेतकऱ्यांचे आधार नंबर सातबारा उताऱ्यांस जोडून माहिती एकत्रित करण्यात येत आहे.आधारकार्ड साताबारा उतारा संलग्नतेचे काम पूर्ण झाल्यावर केंद्र आणि राज्य शासनाच्या शेतकऱ्यांकरिता असलेल्या सर्व योजनांचा लाभ शेतकऱ्यांना विनाविलंब उपलब्ध करुन देणे शक्य होणार आहे.
महाराष्ट्र राज्यात २१ जानेवारी २०२५ च्या आदेशान्वये ॲग्रीस्टॅक उपक्रमाच्या अंमलबजावणी करिता विशेष कॅम्प आयोजित करण्याच्या सूचना सर्व जिल्हा प्रशासनांना देण्यात आल्या आहेत.ॲग्रीस्टॅक अंतर्गत आधार नंबर व पत्ता,पॅन कार्ड,जमीन मालकी,बँक खाते ही सर्व माहिती एकत्र करून अत्याधुनिक एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने विश्लेषण करणे सहज शक्य होणार आहे.कमाल जमीन धारणा कायद्याप्रमाणे जमीन घेण्यास मर्यादा असून जास्तीत जास्त १८ एकर बागायत जमीन घेता येते.जिरायत जमिनीला मर्यादा आहे.ॲग्रीस्टॅक योजनेच्या अंमलबजावणीमुळे शेतकऱ्यांना शासन योजनेचे लाभ जसे सत्वर मिळू शकणार आहेत,त्याच बरोबर दुसरा फायदा म्हणजे, देशात कुणाकडे,कुठे आणि किती जमीन आहे,याची सर्व माहिती सरकारला मिळणार आहे.ॲग्रीस्टॅक प्रकल्पात वरकरणी केवळ शासकीय योजनाचा लाभ घेण्यासाठी याचा उपयोग होईल,असे दिसत असले तरी त्याचे अनेक दूरगामी फायदे होणार असून, बेकायदा जमीन खरेदी-विक्री आणि बेकायदा अमर्याद जमीनधारण करणे यांस आळा बसणार आहे.
- Advertisement -

