Sunday, August 2, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता राज्यात अंमलात येणार धर्मांतर-विरोधी 'महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा-२०२६'.. -कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यास सात...

आता राज्यात अंमलात येणार धर्मांतर-विरोधी ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा-२०२६’.. -कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यास सात वर्षापर्यंतच्या कारावासाची तरतूद..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध जिल्ह्यात अनेक नागरिकांनी स्वतःचा धर्म बदलून दुसऱ्या धर्माचे स्वीकार केल्याचे,तसेच धर्म बदलल्यानंतरही मूळ धर्मातील लाभ घेण्याचा सपाटा चालवल्याचे मुद्दे महाराष्ट्र विधानसभेत गाजले होते.त्यानुसार,राज्यात धर्मांतर-विरोधी ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा-२०२६’ यापुढे लागू करण्यात येणार असल्याची मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती. घोषणेनंतर राज्याच्या विधिमंडळात मार्च-२०२६ मध्ये पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सदरचा कायदा मंजूर करण्यात आला होता.त्यानंतर तो मंजुरीसाठी राज्यपाल आणि अंतिम मान्यतेसाठी राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आला होता.आता महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मंजुरी मिळाली असून राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी हे विधेयक अधिसूचना जारी करण्यासाठी राज्य सरकारकडे पाठवले आहे.आता राज्य सरकार या कायद्याच्या अंमलबजावणीची तारीख निश्चित करेल.त्यानंतर, ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा-२०२६’ कायदा राज्यात अंमलात येणार आहे.
नव्या कायद्यात बळजबरी,फसवणूक,आमिष,चुकीची माहिती किंवा केवळ लग्नाचे खोटे आश्वासन देऊन केल्या जाणाऱ्या धर्मांतरावर सक्त बंदी घालण्यात आली आहे.कायद्यातील कडक तरतुदींनुसार,धर्मांतर करण्यापूर्वी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना ६० दिवस अगोदर लेखी सूचना देणे अनिवार्य करण्यात आले असून, धर्मांतरित व्यक्तीचे पालक,भावंडे किंवा इतर नातेवाईक याप्रकरणी थेट तक्रार दाखल करू शकतात.या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यास ७ वर्षापर्यंतच्या कारावासाची तरतूद करण्यात आली असून,गुन्ह्याची पुनरावृत्ती करणाऱ्या गुन्हेगारांसाठी ही शिक्षा १० वर्षांपर्यंत वाढवली जाऊ शकते. विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले होते की,केवळ बळजबरीने किंवा फसवणूक करून होणाऱ्या धर्मांतराला आळा घालणे हाच या कायद्याचा मुख्य उद्देश असून,स्वेच्छेने होणारे धर्मांतर किंवा आंतरधर्मीय विवाहांना लक्ष्य करण्याचा शासनाचा कोणताही हेतू नाही.विशेष म्हणजे, या विधेयकाला काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, समाजवादी पक्ष आणि सीपीआय(एम)यांनी कडाडून विरोध केला होता.तर शिवसेना ठाकरे गटाने याला पाठिंबा दिला होता.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर ‘त्या’ आत्महत्येचे कारण आले समोर.. – दोन सख्ख्या भावांनी धावत्या रेल्वेसमोर उडी घेतल्याचे प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील माळेगाव  टाऊन परिसरात गुरुवार ३० जुलै २०२६ रोजी दोन सख्ख्या भावांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना सकाळच्या सुमारास...

पूर ओसरला; प्रशासनाकडून घराघरांत जाऊन पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मागील दोन दिवसांत  झालेल्या अतिवृष्टीमुळे भामरागड तालुक्यातील पर्लकोटा आणि पामुलागौतम नदीला मोठा पूर आला होता.परिस्थिती आता सामान्य असून पूर ओसरल्यानंतर प्रशासनाने...

चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात चीमुकल्यांवर अत्याचार होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो (एनसीआरबी)च्या अहवालानुसार,महाराष्ट्र राज्यात बालकांवरील अत्याचारांचे प्रमाण...

तीन चिमुकल्यांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू; आज दुपारच्या घटनेने हळहळ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील मौजा-खेडेगाव येथे आज,शनिवार १ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजताच्या सुमारास सती नदीत आंघोळीसाठी गेलेल्या चार अल्पवयीन मुलांपैकी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!