उद्रेक न्युज वृत्त :-विश्रांती घेतलेला पाऊस परत पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार,आज शनिवार १५ ऑगस्ट रोजी विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक राहणार आहे.विशेषतः आज संपूर्ण विदर्भात पावसाचा अंदाज असून बुलढाणा, अकोला,अमरावती,वाशीम,यवतमाळ,वर्धा,नागपूर, चंद्रपूर,गडचिरोली भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे.त्याचबरोबर,उद्या रविवारीही विदर्भात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. अमरावती,अकोला,नागपूर,भंडारा आणि गोंदिया या विदर्भातील जिल्ह्यांसाठी रविवारीही ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे.तसेच,रायगड आणि साताऱ्याच्या घाट परिसरासाठी रविवारी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने तिथेही ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.विशेष म्हणजे,काल शुक्रवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत राज्यातील सर्वाधिक तापमान ३४.२ अंश सेल्सिअस चंद्रपूर येथे नोंदवले गेले.तर,सर्वांत नीचांकी तापमान महाबळेश्वर येथे १७.५ अंश सेल्सिअस इतके होते.तसेच, घाटमाथ्यावरील ताम्हिणी येथे सर्वाधिक १३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.पुढील ४८ तासांत महाराष्ट्रात पावसाचा सर्वाधिक जोर विदर्भात आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात पाहायला मिळणार आहे. शहरी भागांसाठी कोणताही मोठा अलर्ट नसला,तरी घाट परिसर आणि विदर्भातील नागरिकांनी सतर्क राहावे,असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
आजपासून पावसाचा जोर वाढणार..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

