- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-देशात १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असतांनाच जालना शहरात स्वातंत्र्यदिनी लोकशाहीला लाजवेल,अशी घटना उघडकीस आली होती.स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्री पंकजा मुंडे जालन्यात गेल्या असता त्यांच्या भेटीसाठी जाणाऱ्या आंदोलकांनी ताफा अडवण्याचा प्रयत्न केला असता आंदोलनकर्त्याला पकडुन नेत असतांनाच पोलीस उपअधीक्षक (डीवायएसपी)अनंत कुलकर्णी यांनी मागून धावत जात बुटांसह सिनेस्टाईलने अमित चौधरी या आंदोलकाच्या कंबरेत लाथ मारली होती.आंदोलन कर्त्याला लाथ मारल्याने समाज माध्यमांवर घटनेचे तीव्र पडसाद उमटू लागले होते.प्रकरणी पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांचेवर कारवाईची मागणी करण्यात आली होती.अश्यातच आता आंदोलकाच्या कमरेत लाथ मारणे पोलीस उपअधीक्षकास भोवणार आहे.सदर प्रकरणाची दखल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतली आहे. आंदोलकाच्या कमरेत लाथ मारणे म्हणजे घटनेतील मूलभूत अधिकारांचा भंग होत असल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीने आयोगाकडे केली. त्यानुसार मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष ए.एम.बदर यांनी दखल घेत प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले असून लाथ बसलेल्या आंदोलकाला नुकसान भरपाई का देऊ नये? पोलीस अधिकारी कुलकर्णी यांच्यावर फौजदारी कारवाई का करू नये,त्यांची खातेनिहाय चौकशी का करू नये,या सर्वांचा खुलासा करा,अशी ‘कारणे दाखवा’ नोटीस आयोगाने अतिरिक्त मुख्य गृह सचिव व जालना पोलीस अधीक्षकांना पाठवली आहे.पुढील सुनावणीआधी या नोटीसचे उत्तर द्या.असेही आयोगाने आदेशात नमूद केले आहे.त्यामुळे येत्या काळात पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांचेवर कारवाईची टांगती तलवार अटळ आहे.
- Advertisement -

