- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे.सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आहेत.इच्छुक उमेदवारांनीही कंबर कसली असून राजकीय ‘उड्या’ही सुरु झाल्या आहेत. अशातच विधानसभा निवडणुकांची घोषणा केव्हा होणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.त्यानुसार केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत १० ऑक्टोंबरला दुपारी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन आगामी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली जाईल,अशी विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.निवडणुकांची घोषणा होताच त्या क्षणापासून राज्यात आचारसंहिता लागू होईल.
जम्मू-काश्मीर आणि हरियाणा राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल आठ तारखेला जाहीर होणार आहे.त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा मुहूर्त सुरक्षा दृष्टिकोनातून सोईस्कर होईल असे पण म्हटले जात आहे.
मागील काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकांमधील मेगा निर्णयांचा धडाका पाहता या गोष्टींना बळ मिळत आहे.या अनुषंगाने आगामी १० ऑक्टोंबरला महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे
- Advertisement -

