Wednesday, July 29, 2026
Homeमुंबईविधानसभा निवडणुकांची आचारसंहिता 'या' तारखेला होणार जाहीर...

विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता ‘या’ तारखेला होणार जाहीर…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे.सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आहेत.इच्छुक उमेदवारांनीही कंबर कसली असून राजकीय ‘उड्या’ही सुरु झाल्या आहेत. अशातच विधानसभा निवडणुकांची घोषणा केव्हा होणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.त्यानुसार केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत १० ऑक्टोंबरला दुपारी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन आगामी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली जाईल,अशी विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.निवडणुकांची घोषणा होताच त्या क्षणापासून राज्यात आचारसंहिता लागू होईल.
जम्मू-काश्मीर आणि हरियाणा राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल आठ तारखेला जाहीर होणार आहे.त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा मुहूर्त सुरक्षा दृष्टिकोनातून सोईस्कर होईल असे पण म्हटले जात आहे.
मागील काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकांमधील मेगा निर्णयांचा धडाका पाहता या गोष्टींना बळ मिळत आहे.या अनुषंगाने आगामी १० ऑक्टोंबरला महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तुकाराम मुंढेंनी शाळा व्यवस्थापनावर सोपवली मोठी जबाबदारी; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी विविध निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धडक कारवाईचे सत्र सुरू असतांनाच आता अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी...

माझा वाढदिवस-एक झाड उपक्रम; देसाईगंज आदर्श महाविद्यालयाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा आणि वृक्षारोपणाची सवय प्रत्येकामध्ये रुजावी या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,देसाईगंज येथे "माझा वाढदिवस-एक झाड" हा...

राज्यांतर्गत पिकस्पर्धा; आता शेतकऱ्यांना घरबसल्या अर्ज करण्याची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी तसेच प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांच्या कार्याचा गौरव करून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने...

राज्य सरकार म्हणतेय; गौण खनिजांच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीवर दहापट दंड आकारू.. -चोर खरोखरच चोऱ्या करणे सोडणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-गौण खनिजांची चोरी करणे ही काही चोरट्यांसाठी नित्याचीच बाब झाली आहे.काहींना अवैध रेती,मुरूम,दगड,माती व इतर गौण खनिजांची चोरी केल्याशिवाय चैनच पडेनासे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!