Monday, July 13, 2026
Homeचंद्रपूरचौघांचा बळी घेणाऱ्या वाघिणीला पकडण्यात वनविभागास आले यश.. - शेतकरी,शेतमजूरांसह गुराख्यांनी सोडला...

चौघांचा बळी घेणाऱ्या वाघिणीला पकडण्यात वनविभागास आले यश.. – शेतकरी,शेतमजूरांसह गुराख्यांनी सोडला सुटकेचा निःश्वास…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या मूल तालुक्यातील जंगल परिसरात तसेच शेत शिवारात धुमाकूळ घालून  चौघांचा बळी घेणारी टी ८३ वाघिणीला चंद्रपूर वनविभागांतर्गत चिचपल्ली परिक्षेत्रातील जानाळा नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक- ७१७ मध्ये आज, शनिवार २८ सप्टेंबर रोजी वन विभागाकडून जेरबंद करण्यात आले.वाघिण जेरबंद झाल्याने तालुक्यातील शेतकरी,शेतमजूरांसह गुराख्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
चंद्रपूर वनविभागातील मुल उपक्षेत्रा अंतर्गत जानाळा, कांतापेठ,चिरोली,कवडपेठ,चिचाळा,ताडाळा परिसरातील मानव-वन्यजीव यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होऊन शेतकरी शेतमजूर,नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण केली होती.मागील काही दिवसांत जंगलालगतच्या शेतशिवारात चौघांचा जीव घेतला होता.त्यामुळे या गावांमध्ये प्रचंड दशहत निर्माण होऊन वाघिणीचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात होती.वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे नागरिक भयभीत झाले असताना वनविभागाने वाघिणीला जेरबदं करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.त्यानुसार आज शार्प शूटर अजय मराठे यांनी वाघिणीला बेशुध्द केले.ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.रविकांत खोब्रागडे व त्यांच्या चमुने वाघिणीवर उपचार केले.या वाघिणीने आता पर्यंत जंगलालगतच्या शेतशिवारात काम करणाऱ्या चौघांचा जीव घेतला होता.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!