- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-मॅसेजिंग ॲप टेलिग्रामचे सीईओ पावेल दुरोव यांच्या अटकेनंतर भारत सरकारही चौकशी सुरू करणार आहे.सरकारला हे जाणून घ्यायचे आहे की,हे ॲप गुन्हेगारी कृत्यांमध्ये वापरले जात आहे की नाही,ज्यामध्ये खंडणी आणि जुगार इत्यादींचा समावेश आहे.मीडिया रिपोर्ट्समधून ही माहिती समोर आली आहे.हे ॲप तपासात दोषी आढळल्यास त्याच्यावर बंदीची कारवाई केली जाऊ शकते; असा दावा अहवालात करण्यात आला आहे.
अलीकडेच,फ्रान्स पोलिसांनी टेलिग्रामचे सीईओ पावेल दुरोव यांना अटक केली.फ्रेंच सरकारने रशियन वंशाच्या दुरोववर अनेक गंभीर आरोप केले आहेत; जे सिद्ध झाल्यास २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.भारत सरकारही टेलिग्रामच्या विरोधात ॲक्शन मोडमध्ये आले आहे.केंद्र सरकार दुरोवच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कारवाई करण्याच्या तयारीत आहे.कारवाईदरम्यान सरकारला योग्य वाटल्यास टेलिग्राम ॲपवर भारतातही बंदी घालण्यात येईल.
आयटी मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे की, गृह मंत्रालय विविध बेकायदेशीर कामांबाबत टेलिग्रामवर लक्ष ठेवून आहे.मनी लाँड्रिंग,ड्रग तस्करी आणि पेडोफिलिक सामग्रीचे सामायिकरण अशा बेकायदेशीर कामांच्या तपासाचा समावेश आहे. माहिती आणि तंत्रज्ञान (IT) मंत्रालय लवकरच टेलीग्रामद्वारे होत असलेल्या विविध बेकायदेशीर क्रियाकलापांवर आपल्या शिफारशी गृह मंत्रालयाला पाठवणार आहे.असे वृत पुढारीने दिले आहे.
- Advertisement -

