Wednesday, July 29, 2026
Homeसंपादकीयशेतकऱ्यांच्या आर्थिक लुटीची परंपरा यावर्षी तरी थांबणार काय?

शेतकऱ्यांच्या आर्थिक लुटीची परंपरा यावर्षी तरी थांबणार काय?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

संपादकीय

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके

उद्रेक न्युज वृत्त :- जगाचा पोशिंदा म्हटल्या जाणाऱ्या शेतकरी बांधवांची पिळवणूक करणे केव्हा थांबणार कुणास ठाऊक? जिवाचे रान करून, रात्रंदिवस मेहनत करून,शेती पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवावर सर्वच जण उठले की काय?एकीकडे लागत खर्च जास्त तर उत्पादन कमी; अशी अवस्था असतांनाही कृत्रिमरीत्या येणारे महापूर,हिंस्त्र व जंगली प्राण्यांमुळे पिकांची होणारी नासधूस,कधी अवकाळी पाऊस तर कधी किडीचा प्रादुर्भाव,सततची नापिकी,बँकांच्या कर्जाचे ओझे तसेच इतर कारणांमुळे शेतकरी हवालदिल होऊन; चिंताग्रस्त होऊन आत्महत्या करण्यास धजावित असतात.मात्र याचे कुणाला कसलेही देणे-घेणे नसल्याचे दिसून येते.अशातही शेतकरी बांधवांचे धान निघाले की,आधारभूत किंमत योजनेअंतर्गत हमीभाव केंद्रावर अभिकर्ता संस्थांकडून धानाची खरेदी केली जाते.येथे अभिकर्ता संस्थांनीच शेतकऱ्यांच्या धानाचा काटा करण्यासाठी मजुरांचा खर्च अदा करणे आवश्यक आहे.परंतु हा खर्च शेतकऱ्यांच्या माथी मारला जातो. यावर कुठलीही कारवाई केली जात नाही.हमालीच्या नावावर शेतकऱ्यांकडून ८ ते १० रुपये प्रतिकट्टा वसुली केली जाते.यावर्षी सुद्धा आर्थिक लुटीची पुनरावृत्ती होणार काय? असा सवाल शेतकरी बांधवांकडून उपस्थित केला जात आहे.हमीभाव खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांकडून दरवर्षी हमालीची रक्कम वसूल केली जाते.नाईलाजास्तव शेतकरीसुद्धा मुकाट्याने हमाली देऊन आपले धान विक्री करतात.शेतकऱ्यांच्या असहायतेचा फायदा अभिकर्ता संस्था घेतात.आर्थिक लुटीची ही परंपरा यावर्षी तरी थांबणार काय? असा सवाल उपस्थित होत आहे.अन्यथा ‘आम भरो पोट भारो अन् प्रत्येक वेळेस शेतकरी मरो’ असे केल्यास उपोषणाचा पावित्रा घेण्यात येणार असल्याचे शेतकरी पुत्रांनी म्हटले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तुकाराम मुंढेंनी शाळा व्यवस्थापनावर सोपवली मोठी जबाबदारी; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी विविध निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धडक कारवाईचे सत्र सुरू असतांनाच आता अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी...

माझा वाढदिवस-एक झाड उपक्रम; देसाईगंज आदर्श महाविद्यालयाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा आणि वृक्षारोपणाची सवय प्रत्येकामध्ये रुजावी या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,देसाईगंज येथे "माझा वाढदिवस-एक झाड" हा...

राज्यांतर्गत पिकस्पर्धा; आता शेतकऱ्यांना घरबसल्या अर्ज करण्याची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी तसेच प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांच्या कार्याचा गौरव करून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने...

राज्य सरकार म्हणतेय; गौण खनिजांच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीवर दहापट दंड आकारू.. -चोर खरोखरच चोऱ्या करणे सोडणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-गौण खनिजांची चोरी करणे ही काही चोरट्यांसाठी नित्याचीच बाब झाली आहे.काहींना अवैध रेती,मुरूम,दगड,माती व इतर गौण खनिजांची चोरी केल्याशिवाय चैनच पडेनासे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!