Friday, May 1, 2026
Homeनागपूरकामात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी; नागपूरच्या सात पोलिसांची उचलबांगडी….

कामात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी; नागपूरच्या सात पोलिसांची उचलबांगडी….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नागपूर :- कामात हलगर्जीपणा केल्यामुळे नंदनवन ठाण्याच्या तपास पथकातील ७ पोलिस कर्मचाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.त्या सर्व वादग्रस्त पोलिस कर्मचाऱ्यांची पोलिस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.बनावट नोटा प्रकरण आणि गुन्हेगारावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेले अपयश यामुळे ही कारवाई झाल्याची चर्चा आहे. तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीत जमील अहमद यांचा मोहम्मद परवेज सोहेल, सलमान खान समशेर खान पठाण (२७) हसनबाग,आणि आशिष सोहनलाल बिसेन (१८) खरबी चौक यांनी गोळ्या घालून खून केल्याची घटना घडली होती.यामधील आरोपी सलमान खान हा कुख्यात आबू खानचा भाचा आहे. सलमानवर यापूर्वी अनेक दाखल असताना नंदनवन पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करणे अपेक्षित होते.मात्र, पोलिसांनी सलमानशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले.तसेच नुकताच एटीएसने परवेज ऊर्फ पप्पू पटेल याच्या घरावर छापा घालून २७.५० लाख रुपये जप्त केले होते.पप्पूसोबतही डीबी पथकाचे अर्थपूर्ण संबंध असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी सात पोलिस कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली करून पोलिस मुख्यालयात करण्यात आली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

महाराष्ट्र राज्याचा ६७ वा स्थापना दिन उत्साहात साजरा.. महाराष्ट्र दिनी “समृद्ध गडचिरोली” घडविण्याचा संकल्प..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी “समृद्ध गडचिरोली” घडवण्याचा संकल्प व्यक्त करत विकास, शांतता...

‘आदिशा’ प्रकल्पांतर्गत महिला बचत गटातील लाभार्थ्यांना मिळणार दोन टक्के व्याजदराने १ लाख रुपये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महिला बचत गटांना केवळ २ टक्के व्याजदराने फिरता निधी उपलब्ध करून देत गावपातळीवर आर्थिक साखळी निर्माण करणारा ‘आदिशा’ प्रकल्प जिल्ह्याच्या विकासात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!