Thursday, September 10, 2026
Homeचंद्रपूरवाघाच्या हल्ल्यात गुराखी जागीच ठार….-आज दुपारची घटना….

वाघाच्या हल्ल्यात गुराखी जागीच ठार….-आज दुपारची घटना….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- जंगलात जनावरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने अचानकरित्या हल्ला करताच गुराखी जागीच ठार झाला.सदरची घटना आज दिनांक- २० ऑक्टोंबर २०२३ रोजी मूल तालुक्यातील महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या जानाळा बीट कक्ष क्रमांक ५२३ मध्ये दुपारी ३ च्या सुमारास घडली.बंडू विठ्ठल भेंडारे वय ५८ वर्षे रा.कांतापेठ असे मृत गुराख्याचे नाव आहे.

मूल तालुक्यातील मौजा कांतापेठ येथील बंडू विठ्ठल भेंडारे नेहमीप्रमाणे गुरे चराईसाठी गावा लगतच्या जंगल परिसरात गेला होता.जंगल परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने बंडूवर दुपारच्या सुमारास अचानक हल्ला चढवला.वाघाच्या हल्ल्यामुळे दुपारच्या सुमारास वनविकास महामंडळाच्या जंगल परिसराकडून गुरे गावाच्या दिशेने पळू लागली.त्यामुळे काही नागरिकांना संशय आल्याने नागरिकांनी जंगलाच्या दिशेने धाव घेतली.तो पर्यंत बंडू भेंडारे वाघाच्या हल्ल्यात जागीच ठार झालेला होता.सदर घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी एस.बी.बोथे,वनपाल आर.जी.कुमरे,वनरक्षक यु.आर.गवई,पोलीस निरीक्षक सुमित परतेकी घटनास्थळी दाखल झाले.पंचनामा झाल्यानंतर मृत्तदेह मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यस्तरीय ज्युनियर ‘कुंग फू’ स्पर्धेत वांगेपल्ली शाळेच्या मोहनला कांस्यपदक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पुणे येथे पार पडलेल्या २४ व्या राज्यस्तरीय 'ज्युनियर वुशू स्पर्धा-२०२६' मध्ये अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली येथील शासकीय निवासी शाळेचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी...

पावसाची विश्रांती; पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे- कृषी विभाग

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध भागात ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.अशा परिस्थितीत धान पिकावर पाण्याचा ताण येऊ नये...

आज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्याच्या गट ग्रामपंचायत डोंगरगाव-हलबी येथे परिसरातील चिखली रिट व अरततोंडी येथील...

देसाईगंज पोलिसांची मोठी कामगिरी; हरविलेले २५ मोबाईल मूळ मालकांना परत..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-एकदा कां मोबाईल हरवला, तर तो परत मिळण्याची शाश्वती कमीच असते.मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देत देसाईगंज...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!