Sunday, May 24, 2026
Homeनागपूरदारूच्या नशेत मुलाने केली वडीलाची हत्या -नागपूर येथील घटना…..

दारूच्या नशेत मुलाने केली वडीलाची हत्या -नागपूर येथील घटना…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नागपूर :- शक्तीमातानगर येथे एका मद्यधुंद मुलाने लोखंडी काठीने वार करून वडिलांची हत्या केल्याची घटना घडली आहे. नंदनवन पोलिस स्टेशन हद्दीतील शक्तीमातानगर येथे ही घटना घडली.

कृष्णराव रायपूरकर असे मृतकाचे नाव आहे.नंदनवन पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकरी मुलगा अमित रायपूरकर याला अटक केली.अमित हा नेहमी दारु पिऊन पत्नी व वडिलांना शिवीगाळ करायचा.नेहमीप्रमाणे तो दारू पिऊन आला.त्याने पत्नी अर्चना यांना शिवीगाळ सुरू केली.यामुळे वडील कृष्णराव यांनी अमितला हटकले मात्र, संतप्त अमितने कृष्णराव यांच्या हातातील काठी हिसकावली व त्यांच्यावरच दोन वार केले.यातच कृष्णराव खाली कोसळले.हे पाहून अर्चना यांनी आरडाओरड केला. अखेर शेजाऱ्यांच्या मदतीने कृष्णराव यांना तात्काळ खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी कृष्णराव यांना मृत घोषित केले.

नंदनवन पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.त्यानंतर अमितला अटक केली.रवींद्र नाईकवाडे पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली सदर घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका...

सामान्य माणसाचा जीव २५ लाखांचा ठरवत असाल तर तुम्ही स्वतः वाघासमोर उभे राहा; आम्हीही तुम्हाला २५ लाख देतो..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला.या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.या पार्श्वभूमीवर सामाजिक...

वाढदिवसाचा कार्यक्रम असल्याचा बनाव; बालविवाहात सरकारी पाहुण्यांची एंट्री..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह २० वर्षीय तरुणासोबत लावल्या जात असल्याची माहिती नागपूर जिल्हा बालसंरक्षण कक्षाला प्राप्त होताच पथकाने अल्पवयीन मुलीची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!