Wednesday, July 8, 2026
Homeदेसाईगंजअखेर अपघातातील गंभीर जखमी पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू..

अखेर अपघातातील गंभीर जखमी पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या कुरूड-कोंढाळा बिटातील संतोष रमेश मरसकोल्हे वय ५६ वर्षे, रा.आरमोरी,जि.गडचिरोली यांचा शनिवार ४ जुलै २०२६ रोजीच्या पहाटे देसाईगंजवरून दुचाकीने आरमोरीकडे परत जात असतांना त्यांच्या दुचाकीला रानडुकराने दिलेल्या धडकेने अपघात झाला होता.अपघातात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर नागपूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.अश्यातच नागपूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतांनाच काल मंगळवारच्या रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
संतोष मरसकोल्हे हे देसाईगंज पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक(पीएसआय)पदावर कार्यरत होते.देसाईगंज ठाण्यांतर्गत येणाऱ्या कुरूड,कोंढाळा,शिवराजपुर, उसेगाव,तुळशी व कोकडी इत्यादी गावांचा कारभार त्यांच्याकडे देण्यात आला होता.घटनेच्या दिवशी मरसकोल्हे हे देसाईगंज पोलीस ठाण्यातील शुक्रवारची रात्रपाळी संपवून शनिवार ४ जुलैच्या पहाटे देसाईगंजवरून दुचाकीने आरमोरीकडे परत जात होते. दरम्यान,आरमोरी मार्गावर अचानकपणे समोर आलेल्या रानडुकराने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक बसताच मरसकोल्हे हे डोक्याच्या भारावर खाली कोसळले.यात डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना तात्काळ ब्रम्हपुरीच्या आस्था रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र,प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपूरला हलविण्यात आले होते.तिथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असतांनाच त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या अचानकपणे जाण्याने कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसला असून देसाईगंज प्रशासनातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज उपविभागातील रेती घाटांना नियमानुसार परवानगी; ३०० कोटींच्या महसूल बुडविल्याचा आरोप निराधार.. – देसाईगंज उपविभागीय अधिकाऱ्यांचा खुलासा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या देसाईगंज उपविभागातील रेती घाटांना शासनाच्या वाळू निर्गती धोरणानुसार व विहित प्रक्रियेचे पालन करूनच परवानगी देण्यात आली असून माध्यमातून प्रसिद्ध ३०० कोटीचा...

उद्याला शिक्षकांचे शाळा बंद आंदोलन; शिक्षकांच्या प्रश्नांकडे वेधणार लक्ष..

उद्रेक न्युज वृत्त :-शिक्षकांचे राज्य स्तरावर प्रलंबीत प्रश्न निकाली काढण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना,शिक्षक संघटना समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती,...

‘पावसाळा आला आरोग्य सांभाळा..!’ ग्रामपंचायतींना पाणी शुद्धीकरणाचे कडक निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पावसाळ्याच्या आगमनासोबतच ताप, सर्दी-खोकला,डेंग्यू,मलेरिया,टायफॉइड आणि कॉलरा यांसारख्या जलजन्य व कीटकजन्य आजारांचा धोका वाढतो.नागरिकांनी आरोग्यविषयक योग्य खबरदारी घ्यावी आणि सुरक्षित राहावे,यासाठी सार्वजनिक...

उद्यापासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर होणार कमी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-जुलैच्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये अद्याप सरासरी पेक्षा कमी पाऊस पडला आहे; विशेषतः खानदेश(धुळे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!