Monday, June 15, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तविदर्भातील जिल्हे वगळता आजपासून शाळेला सुरुवात..

विदर्भातील जिल्हे वगळता आजपासून शाळेला सुरुवात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विदर्भातील ११ जिल्हे वगळता आज,सोमवार १५ जूनपासून राज्यातील शाळांना अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. राज्यभरात विविध ठिकाणी मंत्री,लोकप्रतिनिधी आणि शिक्षकांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांचे मनोबल वाढवले.राज्यातील सर्व शाळा १५ जूनपासून सुरू होणे अपेक्षित होते.मात्र,विदर्भातील वाढते उष्णतामान आणि उन्हाळी सुट्ट्यांचा कालावधी यामुळे या भागातील शाळा उशिरा सुरू करण्याची मागणी पुढे आली होती.या मागणीच्या अनुषंगाने काही शिक्षक संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती.त्यानुसार, उष्णतेचा कहर,विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे निर्देश लक्षात घेता शिक्षण विभागाने सीबीएसई आणि राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व प्राथमिक,माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा आता १५ जूनऐवजी ३० जूनपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.शिक्षणाधिकारी (माध्यमिक)यांनी जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी आणि शाळा व्यवस्थापनांना याबाबतचे निर्देश जारी केले आहेत.त्यानुसार,आता नागपूर विभागातील नागपूर,
चंद्रपूर,भंडारा,गोंदिया,गडचिरोली,वर्धा,तसेच अमरावती विभागातील अमरावती,अकोला,यवतमाळ,बुलढाणा आणि वाशिम या विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या शाळा ह्या येत्या,मंगळवार ३० जून २०२६ पासून सुरू होणार आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली जिल्ह्यात तब्बल ११७ ‘आपले सरकार सेवा केंद्र’ होणार स्थापन.. – केंद्र चालक निवडीसाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांना शासकीय सेवा स्थानिक पातळीवर सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात ११७ ‘आपले सरकार सेवा केंद्र’ स्थापन करण्यात येणार आहेत.यामध्ये ११५...

आता प्रथमच होणार जिल्हानिहाय श्रमशक्ती सर्वेक्षण आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याच्या ‘विकसित महाराष्ट्र’ या संकल्पनेला गती देण्यासाठी प्रथमच जिल्हानिहाय श्रमशक्ती सर्वेक्षण आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण राबविण्यात येत असून,गडचिरोली जिल्ह्यात...

उद्यापासून आरटीओ कर्मचारी बेमुदत संपावर; अनेक कामे पडणार ठप्प..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्र राज्यातील आरटीओ कर्मचाऱ्यांच्या बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसंदर्भात प्रशासन सकारात्मक भूमिका न घेता केवळ वेळखाऊ धोरण राबवत असल्याचा आरोप करत...

देशाची राजनीती लक्षात घेऊनच आरपीआय आपली भुमिका ठरवीत असते- प्रदेशाध्यक्ष प्रकाश कुंभे

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-देशाची राजनीती लक्षात घेऊनच आरपीआय आपली राजकीय भुमिका ठरवीत असते,कारण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधानाचे रक्षण करण्याची बांधिलकी रिपब्लिकन पक्षाची आहे.त्यामुळे राष्ट्रीय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!