उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्याच्या विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम असल्याने राज्य शिक्षण विभागाने दिलासादायक निर्णय घेतला आहे.नियोजित वेळापत्रकानुसार १५ जून २०२६ पासून सुरू होणाऱ्या शाळा आता विदर्भात २२ जून २०२६ पासून सुरू होणार आहेत.वाढत्या तापमानामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेता शाळा सुरू करण्यास सात दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.विदर्भातील तापमान सतत ४२ अंश सेल्सिअस ते ४५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान असल्याने शिक्षक आणि पालक संघटनांनी शाळा २६ जूनपर्यंत पुढे ढकलण्याची मागणी केली होती.या मागणीवर सरकारकडून तातडीने निर्णय न झाल्याने काही संघटनांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.या याचिकेवर सुनावणी होण्यापूर्वीच सरकारने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शाळा उशिरा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला.त्यानुसार,२२ जून ते ३० जून या कालावधीत विदर्भातील सर्व शाळा केवळ सकाळच्या सत्रात भरवण्यात येणार आहेत.दुपारच्या कडक उन्हापासून विद्यार्थ्यांचे संरक्षण व्हावे,यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.त्यानंतर १ जुलै २०२६ पासून शाळांचे कामकाज नियमित वेळेनुसार सुरू होईल.विदर्भ वगळता राज्यातील उर्वरित सर्व विभागांमधील शाळा १५ जूनपासून पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार सुरू होणार आहेत.सदरचा निर्णय केवळ विदर्भातील हवामान परिस्थिती लक्षात घेऊन घेण्यात आला आहे.
विदर्भातील शाळांसाठी दिलासादायक निर्णय; शाळा सुरू करण्यास सात दिवसांची मुदतवाढ..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

