नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या अनेक घटना गडचिरोली जिल्ह्याच्या काही भागात प्रवाशांना अनुभवायला मिळाल्या आहेत. अश्यातच आता आज,शुक्रवार १ मे रोजी चक्क धावत्या बसचे चाकच निघाल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.सुदैवाने बस चालकाच्या सतर्कतेने मोठा अनर्थ जरी टळला असला तरीही एसटी बसच्या देखभालीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.सदरची घटना साकोली आगाराच्या एक किलोमीटर आधीच सकाळी साडे दहाच्या सुमारास घडली.आज सकाळच्या सुमारास नागपूर येथील गणेशपेठ आगाराची एमएच ०६ बीडब्ल्यू ०८११ क्रमांकाची बस नागपूरहून देवरीकडे निघाली होती.यात बस चालक निखिल तांबेकर तर वाहक म्हणून स्वीटी निखाडे आणि एकूण ३६ प्रवासी प्रवास करीत होते.प्रवास सुरू असतांनाच धावती बस साकोली आगाराच्या जवळ जाण्यापूर्वीच बसच्या मागच्या डाव्या बाजूचे चाक अचानकपणे निघाले.दरम्यान,बसला काहीतरी झाल्याचे लक्षात येताच बस चालकाने प्रसंगावधान राखत बसचा ब्रेक मारून बस रस्त्याच्या कडेला थांबविली.पाहतात तर बसचे चाक बाहेर निघून दूर जाऊन पडलेले दिसून आले.तत्पूर्वी धावत्या बसचे अचानकपणे संतुलन बिघडल्याने प्रवाशांमध्ये काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली.सदरचा प्रकार लक्षात येताच चालक आणि वाहक यांनी तात्काळ प्रवाशांना बाहेर काढून मदतकार्यासाठी वरिष्ठांना पाचारण केले.
मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

