Wednesday, April 15, 2026
Homeभंडाराबिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला होता.तर शनिवार,२८ मार्च २०२६ रोजी उमरझरी परिसरात ४८ वर्षीय माया रामकृष्ण सोनवाने यांच्यावर वाघिणीने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले होते.त्यांच्यावर भंडारा जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू होते.प्रकृती अधिक खालावल्याने वनविभागाने त्यांना नागपुरातील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते.या दरम्यान बुधवार,१ एप्रिल २०२६ रोजी नागपुरात माया सोनवाने यांचे निधन झाले.एकट्या साकोली तालुक्यातील परिसरात जेमतेम बोटावर मोजण्याइतकेच दिवस झालेले असतांनाच वाघिणीच्या हल्ल्यात दोघांनी जीव गमावला.अश्यातच आता सदरच्या दोन्ही घटना ताज्या असतांनाच परत आज,बुधवार १५ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास बिबट्याने एका पाच वर्षीय चिमुकलीचा जीव घेतल्याची घटना साकोली तालुक्यातील विर्शी गाव नजीकच्या शेतशिवारात घडली.अंशिका काशिनाथ मिरी वय ५ वर्षे, रा.सुहेला,जि.बलोदा(बाजार),छत्तीसगड(हल्ली मुक्काम-विर्शी)असे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.
साकोली तालुक्याच्या विर्शी येथील संजय कापगते यांचे गाव नजीकच्या शेतशिवारात वीटभट्टीचे काम सुरू आहे. याकरीता मजूर म्हणून काशिनाथ मिरी हे कुटुंबीयांसह कापगते यांच्या वीटभट्टीच्या कामावर असल्याने ते शेतातच तात्पुरत्या स्वरूपात वास्तव्यास आहेत.सकाळी उठणे आणि दिवसभर विटा तयार करून पोटाची खळगी भरणे,अशी दिनचर्या मिरी कुटुंबीयांची सुरळीतपणे सुरू असतांनाच आज बुधवारच्या पहाटे दबा धरुन बसलेल्या बिबट्याने अचानकपणे अंशिका हिच्यावर हल्ला चढवून तिला जबड्यात पकडुन नेले आणि ठार केले.पहाटेची घटना असल्याने मिरी कुटूंबीय झोपेतच होते.काही वेळाने सदरचा प्रकार लक्षात येताच माता पित्याने एकच हंबरडा फोडला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

फरार आरोपींवर ‘लुकआउट सर्क्युलर’ नंतर मालमत्ता जप्तीची प्रक्रिया सुरू.. – स्फोटके बनवणाऱ्या कंपनीतील स्फोट प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील स्फोटके बनवणाऱ्या एसबीएल कंपनीत १ मार्च २०२६ रोजी भीषण स्फोट झाला होता.एसबीएल कंपनीच्या आवारात झालेल्या भीषण स्फोटात आतापर्यंत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!