Wednesday, April 15, 2026
Homeगोंदियाशेतकऱ्याने गहाण ठेवलेले सोने परत करण्यास सावकाराकडून टाळाटाळ..

शेतकऱ्याने गहाण ठेवलेले सोने परत करण्यास सावकाराकडून टाळाटाळ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथील सावकार शांताबाई राधेश्याम अग्रवाल यांच्याकडे शेती कामासाठी स्वतःकडील सोने गहाण ठेवून शेतकऱ्याने पैसे उचलले होते.काही दिवसांनी व्याजासह रक्कम परत करून गहाण ठेवलेले सोने परत मागितले असता सावकाराकडून टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे.या प्रकरणी शेतकऱ्याने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे लेखी तक्रार दाखल करून गहाण ठेवलेले सोने परत मिळवून देण्याची मागणी केली आहे.भंडारा जिल्ह्यातील विरगाव येथील रहिवासी नरेश सदाशिव गजभिये असे अन्यायग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे.विशेष म्हणजे,नियमानुसार कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनाच सोने तारण कर्ज देता येते.मात्र, कार्यक्षेत्राबाहेरील आदिवासी शेतकऱ्याचे सोने गहाण ठेवण्यात आल्याने परवानाधारक सावकारांची चौकशी करावी,अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शेतकऱ्यांनी सोने गहाण ठेवतांना वजन,रक्कम व व्याजाची पावती देणे आवश्यक आहे.मात्र,अनेक सावकारांकडून पावती न देता साध्या कागदावर व्यवहार करण्यात येत आहेत.नरेश गजभिये हे आदिवासी समाजातील असून अल्पभूधारक शेतकरी आहेत. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने ते मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!