Wednesday, July 15, 2026
Homeगोंदियाशेतकऱ्याने गहाण ठेवलेले सोने परत करण्यास सावकाराकडून टाळाटाळ..

शेतकऱ्याने गहाण ठेवलेले सोने परत करण्यास सावकाराकडून टाळाटाळ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथील सावकार शांताबाई राधेश्याम अग्रवाल यांच्याकडे शेती कामासाठी स्वतःकडील सोने गहाण ठेवून शेतकऱ्याने पैसे उचलले होते.काही दिवसांनी व्याजासह रक्कम परत करून गहाण ठेवलेले सोने परत मागितले असता सावकाराकडून टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे.या प्रकरणी शेतकऱ्याने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे लेखी तक्रार दाखल करून गहाण ठेवलेले सोने परत मिळवून देण्याची मागणी केली आहे.भंडारा जिल्ह्यातील विरगाव येथील रहिवासी नरेश सदाशिव गजभिये असे अन्यायग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे.विशेष म्हणजे,नियमानुसार कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनाच सोने तारण कर्ज देता येते.मात्र, कार्यक्षेत्राबाहेरील आदिवासी शेतकऱ्याचे सोने गहाण ठेवण्यात आल्याने परवानाधारक सावकारांची चौकशी करावी,अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शेतकऱ्यांनी सोने गहाण ठेवतांना वजन,रक्कम व व्याजाची पावती देणे आवश्यक आहे.मात्र,अनेक सावकारांकडून पावती न देता साध्या कागदावर व्यवहार करण्यात येत आहेत.नरेश गजभिये हे आदिवासी समाजातील असून अल्पभूधारक शेतकरी आहेत. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने ते मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अज्ञात वाहनाची बिबट्याला धडक; बिबट्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याला एका भरधाव वेगात असलेल्या अज्ञात वाहनाने जोरात धडक दिल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन  बिबट्याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना...

मधमाशी पालन केंद्र योजना; ५० टक्के अनुदानासह मधाला हमीभावाची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी करून शेतकरी व युवकांना शाश्वत उत्पन्नाचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत 'मध...

राज्याच्या विविध भागात पाऊस करणार दमदार एंट्री..

उद्रेक न्युज वृत्त :- 'नैसर्गिक आपत्तीस मंडळ जबाबदार राहणार नाही' अश्या म्हणण्याप्रमाणे पावसाचे काही खरे नाही.कुठे मुसळधार पडतो तर कुठे पाण्याचा एक थेंबही पडत नाही.त्यातच...

आता राज्यभरातील धनादेश अनादराची प्रकरणे परस्पर सामंजस्याने निघणार निकाली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये निगोशिएबल इन्स्ट्रुमेन्ट्स ॲक्ट,१८८१ च्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!