Wednesday, July 15, 2026
Homeगोंदियाअंगावर शाळेचा गेट कोसळल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू..

अंगावर शाळेचा गेट कोसळल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :-शाळेची सुट्टी झाल्याने शाळेच्या गेटमधून विद्यार्थी बाहेर पडत असतांनाच अचानकपणे शाळेचा गेट(लोखंडी फाटक)अंगावर पडल्याने एका अकरा वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,शनिवार ११ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा येथील नगरपरिषदेद्वारा संचालित पीएम श्री राणी अवंतीबाई प्राथमिक शाळा,लोधीटोला येथे घडली.यात निराली मनीष चाफले वय ११ वर्षे असे मृत पावलेल्या विद्यार्थिनीचे नाव असून ती इयत्ता पाचव्या वर्गात  शिक्षण घेत होती.

आज,शनिवारी दुपारी सुमारे एक वाजेच्या सुमारास शाळेची सुट्टी झाल्यानंतर विद्यार्थी शाळेतून बाहेर पडत असतांना शाळेसमोरील गेट अचानक कोसळला.यात निराली गेटखाली अडकली आणि ती गंभीर जखमी झाली.घटनेनंतर तिला तातडीने तिरोडा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारार्थ गोंदिया येथे नेत असतांनाच वाटेतच तिचा मृत्यू झाला.निरालीची आई शुभांगी चौधरी (चाफले)या पीएम श्री राणी अवंतीबाई प्राथमिक शाळा, लोधीटोला शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. अश्यातच त्यांच्याच मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.शाळेचा मुख्य गेट गेल्या काही वर्षांपासून अत्यंत जीर्ण अवस्थेत होता.मात्र, याकडे संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अज्ञात वाहनाची बिबट्याला धडक; बिबट्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याला एका भरधाव वेगात असलेल्या अज्ञात वाहनाने जोरात धडक दिल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन  बिबट्याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना...

मधमाशी पालन केंद्र योजना; ५० टक्के अनुदानासह मधाला हमीभावाची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी करून शेतकरी व युवकांना शाश्वत उत्पन्नाचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत 'मध...

राज्याच्या विविध भागात पाऊस करणार दमदार एंट्री..

उद्रेक न्युज वृत्त :- 'नैसर्गिक आपत्तीस मंडळ जबाबदार राहणार नाही' अश्या म्हणण्याप्रमाणे पावसाचे काही खरे नाही.कुठे मुसळधार पडतो तर कुठे पाण्याचा एक थेंबही पडत नाही.त्यातच...

आता राज्यभरातील धनादेश अनादराची प्रकरणे परस्पर सामंजस्याने निघणार निकाली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये निगोशिएबल इन्स्ट्रुमेन्ट्स ॲक्ट,१८८१ च्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!