Wednesday, July 15, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआज राज्यातील तब्बल दहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या.. - बदल्यांचे सुलतान म्हणवणाऱ्यांचीही बदली..

आज राज्यातील तब्बल दहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या.. – बदल्यांचे सुलतान म्हणवणाऱ्यांचीही बदली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या सनदी अधिकाऱ्यांच्या(आयएएस अधिकारी)बदल्यांमध्ये आज, मंगळवार ३१ मार्च रोजी मोठी उलथापालथ झाली आहे. विशेष म्हणजे,प्रशासकीय बाबीतील आजचा दिवस हा आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असून या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशीच तब्बल दहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्यातील खास बात म्हणजे,बदल्यांचे सुलतान म्हणवणाऱ्यांचीही बदली करण्यात आली आहे.ते म्हणजे तुकाराम मुंढे.आतापर्यंत त्यांची २१ वर्षाच्या कार्यकाळात तब्बल २५ वेळा बदली झाली आहे.ऑगस्ट २००५ रोजी प्रशिक्षणार्थी म्हणून सोलापूर जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी पदी नियुक्त झालेले तुकाराम मुंढे हे वविध जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुक्त,जिल्हाधिकारी,विक्रीकर सह आयुक्त,सह सचिव, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारत,सचिव पशुसंवर्धन आणि दुग्धविकास,सचिव मराठी भाषा विभाग,असंघटित कामगार विकास आयुक्त पासून ते आज,३१ मार्च रोजी त्यांची मुंबईच्या मंत्रालय विभागातील दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिव पदावरून आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन व मदत कार्य,महसूल व वन विभाग,मंत्रालय, मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.तुकाराम मुंढे हे २००५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.ते त्यांच्या प्रामाणिकपणासाठी प्रसिद्ध आहेत.त्यामुळे त्यांना बदल्यांचा सुलतान म्हणतात.मुंढे यांनी दिव्यांगांसाठीच्या योजनांचा लाभ बोगसगिरीने घेणाऱ्यांविरुद्धची मोहीम त्यांनी सुरू केली होती.राज्यातील बोगस दिव्यांगांची झाडाझडती घेण्याचे काम सुरू असतांनाच त्यांची बदली करण्यात आल्याने भल्या लोकांचा जमानाच राहिलेला नसल्याची खंत व्यक्त करण्यात येत आहे.
  • आज झालेल्या बदल्या👇
१.तुकाराम मुंढे (IAS:RR:२००५): सचिव,दिव्यांग कल्याण विभाग,मंत्रालय,मुंबई यांची सचिव,आपत्ती व्यवस्थापन,पुनर्वसन व मदत कार्य,महसूल व वन विभाग,मंत्रालय,मुंबई येथे बदली.
२.माणिक गुरसल (IAS:SCS:२००९): यांची सचिव,दिव्यांग कल्याण विभाग,मंत्रालय,मुंबई येथे नियुक्ती.
३.अश्विनी भिडे(IAS:RR:१९९५): मुख्यमंत्री यांचे अतिरिक्त मुख्य सचिव,यांची मुंबई महानगरपालिका आयुक्त,मुंबई म्हणून नियुक्ती.
४.परिमल सिंह(IAS:RR:२००४): प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प(POCRA), मुंबई,यांची सचिव(कृषी),कृषी व पशुसंवर्धन विभाग, मंत्रालय,मुंबई येथे नियुक्ती.
५.पृथ्वीराज बी.पी. : अतिरिक्त आयुक्त,पुणे महानगरपालिका,पुणे यांची आयुक्त,वसई-विरार महानगरपालिका येथे नियुक्ती.
६.लहू माळी (IAS:SCS:२००९): व्यवस्थापकीय संचालक,शिवशाही पुनर्वसन प्रकल्प लि.,मुंबई येथे नियुक्ती.
७.लोकेश चंद्र(IAS:RR:१९९३):अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक,महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.,यांची मुख्यमंत्री यांचे अतिरिक्त मुख्य सचिव,मुंबई येथे नियुक्ती.
८.विकास चंद्र रस्तोगी (IAS:RR:१९९५): अतिरिक्त मुख्य सचिव(कृषी),कृषी व पशुसंवर्धन विभाग,मंत्रालय,मुंबई,यांची अतिरिक्त मुख्य सचिव (वित्तीय सुधारणा),वित्त विभाग,मंत्रालय,मुंबई येथे नियुक्ती.
९.विनिता वैद्य सिंघल (IAS:RR:१९९६): प्रधान सचिव,आपत्ती व्यवस्थापन,पुनर्वसन व मदत कार्य, महसूल व वन विभाग,मंत्रालय,मुंबई यांची प्रधान सचिव,मृद व जलसंधारण विभाग,मंत्रालय,मुंबई येथे नियुक्ती.
१०.प्रेरणा देशभ्रतार (IAS:RR:२०१०): सह आयुक्त,राज्य कर विभाग,मुंबई यांची आयुक्त, मत्स्यव्यवसाय विभाग,मुंबई येथे नियुक्ती.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बांधकाम कामगारांसाठी मोठा निर्णय; कामगारांना मिळणाऱ्या लाभ रकमेत वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम कामगारांसाठी मोठा आणि महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मंडळाच्या चार प्रमुख कल्याणकारी...

अज्ञात वाहनाची बिबट्याला धडक; बिबट्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याला एका भरधाव वेगात असलेल्या अज्ञात वाहनाने जोरात धडक दिल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन  बिबट्याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना...

मधमाशी पालन केंद्र योजना; ५० टक्के अनुदानासह मधाला हमीभावाची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी करून शेतकरी व युवकांना शाश्वत उत्पन्नाचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत 'मध...

राज्याच्या विविध भागात पाऊस करणार दमदार एंट्री..

उद्रेक न्युज वृत्त :- 'नैसर्गिक आपत्तीस मंडळ जबाबदार राहणार नाही' अश्या म्हणण्याप्रमाणे पावसाचे काही खरे नाही.कुठे मुसळधार पडतो तर कुठे पाण्याचा एक थेंबही पडत नाही.त्यातच...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!