- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.काल शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडलेल्या विचित्र अपघातात चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल तालुक्यातील हळदी येथील एका ४२ वर्षीय इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाला.भारत शेंडे असे अपघात मृत पावलेल्या इसमाचे नाव असून सदरचा अपघात चामोर्शी तालुक्याच्या आष्टी-आलापल्ली मार्गावरील मार्कंडा फाट्यानजिक घडला.विशेष म्हणजे, पहिल्यांदा दोन दुचाक्या एकमेकींना धडकल्या.यात भारत शेंडे हे खाली कोसळले.तितक्यातच पाठीमागून येणारा ट्रक अंगावरून गेल्याने भारत शेंडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.प्रकरणी शेंडे यांच्या दुचाकीला धडक देणारा दुचाकीस्वार आरोपी अक्षय तारक शहा रा. सुभाषग्राम,ता.चामोर्शी,जि.गडचिरोली व ट्रक चालक रविशंकर बुद्धलाल नागलेकर रा.शिवनगर,कांद्री कन्हान,ता.पारशिवनी,जि.नागपूर या दोघांविरोधात मृतकाची पत्नी प्रिती भारत शेंडे वय ३४ वर्षे, रा.हळदी,ता.मूल,जि.चंद्रपूर यांनी आज,रविवार २२ मार्च रोजी आष्टी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), २८१,१२५(ब) व मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेचा पुढील तपास आष्टी पोलीस ठाण्याचे पीएसआय मदन मस्के करीत आहेत.
- Advertisement -

