Sunday, May 31, 2026
Homeबीडतहसीलदाराचा खतरनाक कारनामा; चिठ्ठीवर लिहिले आकडे अन् म्हणाला 'अजून तीन टाका नं'..

तहसीलदाराचा खतरनाक कारनामा; चिठ्ठीवर लिहिले आकडे अन् म्हणाला ‘अजून तीन टाका नं’..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
बीड :-जिकडे पाहावे तिकडे अनेकजण वरच्या कमाईच्या मागे लागलेले दिसून येतात.त्यातच,काहीजण स्वतःहून पैश्याचे आमिष दाखवतात.तर काहीजण ‘आम्ही कशाला पैसे देऊ,त्यांना पगार कमी पडतो कां? असे म्हणत एखादे शासकीय काम करवून घेण्याचे पैसे देण्याचे टाळतात.मात्र,काम न करता एखादा पक्काच पैसे खाण्यात पटाईत असेल तर त्याची वाट लावण्यात सर्वसामान्य लोकं मागे पुढे पाहत नाही आणि तसेच झाले एका प्रकरणात.महत्वाचे म्हणजे,काही अधिकाऱ्यांनी आपल्या पदाला तरी शोभेल अशी वर्तवणूक करणे आवश्यक आहे.हल्ली राज्यात शासकीय अधिकाऱ्यांच्या लाचेची प्रकरणे गाजत असतांनाच चक्क एका तहसीलदाराचा खतरनाक कारनामा काल शुक्रवारी बीड जिल्ह्यात उघडकीस आला.बीड जिल्ह्याच्या परळी येथील तहसीलदाराने सॉल्वन्सी म्हणजेच ऐपत प्रमाणपत्र देण्यासाठी तडजोडीअंती २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.तीनदा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला होता.मात्र,संशय आल्याने तहसीलदाराने लाच स्वीकारली नाही.अश्यातच लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्याने ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.व्यंकटेश मुंडे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तहसीलदाराचे नाव आहे.
विशेष बाब म्हणजे,बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार प्राप्त होताच पडताळणीवेळी व्यंकटेश मुंडे यांनी चिठ्ठीवर लाचेचे ५०,नंतर २५ असे आकडे लिहून लाच मागितल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान,तक्रारदाराने २० हजार देतो,असे म्हणताच ‘अजून तीन टाका नं’ असे म्हणत २३ हजारांची मागणी केली.यानंतर तीन वेळा लाचलुचपत विभागाने सापळा लावला होता.मात्र,संशय आल्याने मुंडे यांनी लाच स्वीकारली नाही.एसीबीने त्यांच्या जवळील साधारण ८० हजार रुपयांचे दोन मोबाईल जप्त केले.दरम्यान, तहसीलदार मुंडे यांना ताब्यात घेतल्यानंतर एसीबीने त्यांच्या नांदेड येथील यशोविहार भागातील घराची झाडाझडती घेतली.झडती दरम्यान पोलिसांना तब्बल १३ तोळे सोने आणि ५५ हजार रूपये आढळून आल्याने जप्त केले.तहसीलदार व्यंकटेश मुंडे नागरिकांच्या कामांकडे दुर्लक्ष करून येणाऱ्या लक्ष्मीची कामे पटकन करण्यात व्यस्त असायचे.त्यामुळे,सदरची कारवाई होताच तहसील परिसरात उपस्थित ग्रामस्थांनी फटाके फोडत आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विवाहित महिलेचा गळा चिरून हत्या करणारा आरोपी अटकेत.. – क्षुल्लकशा कारणावरून हत्या; बालपणापासून होते प्रेमप्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या धोपटाळा कामगार वसाहतीत एका विवाहित महिलेची धारदार शस्त्राने गळा चिरून निघृण हत्या करण्यात आल्याची थरारक घटना शुक्रवार...

धानोरा व एटापल्ली तालुक्यात २० हजार धुररहित चुलींचे वितरण.. -दरवर्षी ४१ हजार टनांहून अधिक जळाऊ लाकडाची होणार बचत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शन व पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा व एटापल्ली या दुर्गम,आदिवासी तालुक्यांमध्ये राबविण्यात आलेल्या धुररहित चुल उपक्रमाला उल्लेखनीय...

चार दिवसांत उष्माघाताचे तब्बल १८ जण बळी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या नवतपाचे दिवस सुरू आहेत.२५ मे २०२६ पासून सुरू झालेली सूर्याची दाहकता २ जून २०२६ पर्यंत राहणार आहे.अश्यातच भयंकर तापणाऱ्या नवतप्याने...

हाताची दोन बोटे दाखवून सेल्फी काढत असाल तर सावधान..!

उद्रेक न्युज वृत्त :-डिजिटल युगात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होतांना दिसून येत आहे.काही कालावधीपासून डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून नागरिकांची लाखो रुपयांपासून ते कोट्यवधी रुपयांची फसवणूक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!