Friday, July 17, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तलाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी.. ई-केवायसी करतांना चूक झाली असेल तर दुरुस्ती करून...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी.. ई-केवायसी करतांना चूक झाली असेल तर दुरुस्ती करून घ्या; आजपासून पोर्टल सुरू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना ई-केवायसी केल्याशिवाय महिण्याकाठी मिळणाऱ्या दीड हजाराची रक्कम खात्यात जमा करण्यात येणार नसल्याचे शासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले होते.त्यानुसार,ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत असल्याने अनेक लाभार्थी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया तर पूर्ण केली; पण ई-केवायसी पूर्ण करतेवेळी लाभार्थी महिलांकडून पर्याय निवडतांना चुकीचा पर्याय निवडला गेला.त्यामुळे अनेक महिलांच्या खात्यात दीड हजाराची रक्कम जमा होणे बंद झाल्याने राज्यभरात विविध ठिकाणी मोर्चे काढण्यात आले होते व शासनाच्या वतीने लाडक्या बहिणींना आश्वासन देऊन कुणीही लाभापासून वंचित राहू नये,याकरीता प्रयत्न सुरू असल्याचे सांगितल्या गेले होते.त्यानुसार,महिला व बाल विकास विभागाने ई-केवायसीचे पोर्टल आज,शुक्रवार ६ फेब्रुवारीपासून पुन्हा सुरु केले आहे.त्यामुळे आजपासून या पोर्टलवरुन ई-केवायसीची दुरुस्ती ३१ मार्च २०२६ पर्यंत करता येणार आहे.राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाने शासन परिपत्रक काढून पोर्टल सुरू करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले असल्याने घेतलेल्या निर्णयामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला असून आता ३१ मार्चपर्यंत ई-केवायसी दुरुस्ती करता येणार आहे.
  • ई-केवायसीसाठी👇
ई-केवायसी करण्यासाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाईट वर जावे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री; एसटीच्या तिकीट दरात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्य परिवहन प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटी बसेसच्या भाडेवाढीच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. आखाती देशांतील युद्धामुळे इंधनाच्या किंमतीत...

आता राज्यातील रुग्णालयांत इच्छामरणासाठी विशेष वैद्यकीय समित्या होणार स्थापन; शासन निर्णय जारी..

उद्रेक न्युज वृत्त :-जेव्हा एखादी व्यक्ती अत्यंत गंभीर व्याधीने ग्रस्त आणि दीर्घकाळ बेशुद्धावस्थेत राहते, तेव्हा अशी व्यक्ती स्वतः निर्णय घेऊ शकत नाही.अशा वेळी मरण...

महामार्गाच्या मध्यभागी आलेले पाणीपुरवठा योजनेचे चेंबर धोकादायक; संबंधित विभागाचे दुर्लक्ष.. – रविंद्र गोटेफोडे यांची तातडीने स्थलांतराची मागणी

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा शहरातून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४३ च्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे चेंबर थेट रस्त्याच्या मध्यभागी आल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला...

सर्पदंश झाल्यास काय करावे आणि काय करू नये,घ्या जाणून.. – गडचिरोली जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत एकूण १३४ सर्पदंशाच्या घटनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पावसाळ्याच्या दिवसांत शेतीची कामे वाढल्यामुळे आणि बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे सापांचा मानवी वस्तीत व शेतात वावर वाढतो.गडचिरोली जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र व जंगलाचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!