- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेवरून काँग्रेस बाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण होऊन आमदार विजय वडेट्टीवार वर्सेस खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यात अंतर्गत वाद सुरू होता.अश्यातच आता वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यातील अंतर्गत कलहाचा समारोप दिल्ली दरबारी झाल्याचे समोर आले आहे.दिल्लीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्यानंतर आज,गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी त्यावर तोडगा निघाला आहे.त्यानुसार,चंद्रपूर महानगरपालिकेचे महापौरपद धानोरकर गटाकडे,तर उपमहापौरपदी वडेट्टीवारांच्या समर्थकांना संधी मिळणार आहे.
चंद्रपूर वादावर विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेत म्हणाले की, ‘महाराष्ट्र काँग्रेस आणि दिल्लीतून घेण्यात आलेल्या निर्णयानुसार खासदार प्रतिभा धानोरकर आणि गटनेता राजेश अरुण म्हणतील तो महापौर होईल.’ पुढे बोलतांना विजय वडेट्टीवार म्हणाले की, ‘काँग्रेसचे गटनेता म्हणून राजेश अडूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.उपमहापौरपदी आमचे वसंत देशमुख यांनी अर्ज भरला आहे.मात्र,आम्ही महापौर पदाचा अर्ज भरला नाही.तर धानोरकरांकडून चार महिलांनी अर्ज भरलेत.आज संध्याकाळी काँग्रेसची गटनोंदणी होणार आहे.’ दरम्यान,या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलाही सत्तेत वाटा मिळणार आहे. स्थायी समिती शिवसेना ठाकरे गटाच्या ताब्यात देण्याचे ठरले आहे.सध्या काँग्रेसकडे २७ नगरसेवक असून जनविकास सेना पप्पू देशमुख यांचे ३ नगरसेवक काँग्रेसबरोबर आहेत.त्यांना एमआयएम पक्षाने पाठिंबा दिल्याने ते १ नगरसेवक जनविकास सेनेबरोबर आहे.बसपाने देखील काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सध्या ३२ चे संख्याबळ असून अजून २ नगरसेवकांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे.याबाबत सर्व स्तरावर चर्चा सुरू आहे,असेही वडेट्टीवार म्हणाले.
- Advertisement -

