Friday, July 17, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तमग महाराष्ट्रात EVM मशीनचा हट्ट का? जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका...

मग महाराष्ट्रात EVM मशीनचा हट्ट का? जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या.. – नाना पटोलेंनी मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष तथा साकोली(भंडारा) विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यांना पत्र लिहून राज्यातील राजकारणावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांनी महाराष्ट्रातील निवडणूक व्यवस्थेचा बुरखा पूर्णतः फाटलेला आहे.शहरी भागात झालेली अत्यल्प मतदानाची टक्केवारी ही केवळ “मतदार उदासीनता” नसून,निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कमी होत असल्याचे निदर्शक आहे.
मतदार यादीतील घोळ,मतदान केंद्र शोधण्यासाठी मतदारांना दोन-तीन तास वणवण,आणि अखेरीस हजारो नागरिकांना मतदान न करता परत जावे लागणे.या साऱ्या बाबी निवडणूक आयोगाच्या अकार्यक्षमतेचे गंभीर निदर्शक आहेत.ही परिस्थिती लोकशाहीसाठी घातक असून,तिची जबाबदारी कोण घेणार,हा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे.
अत्यंत गंभीर बाब म्हणजे,या निवडणुकांमध्ये VVPAT प्रणालीचा वापर करण्यात आलेला नव्हता.त्यामुळे मतदाराला आपल्या मताची खात्री करण्याचा अधिकारच हिरावून घेण्यात आला.त्यात भर म्हणजे,मतदारांच्या बोटावर लावलेली शाई हात धुतल्यानंतर सहज निघून जात असल्याचे शेकडो व्हिडीओ आणि प्रत्यक्ष उदाहरणे प्रसारमाध्यमांतून समोर आली.या साऱ्या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता,विश्वासार्हता आणि आयोगाची निष्पक्षता यावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
देशातील अनेक राज्यांनी जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी आणि वाद टाळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याचा निर्णय घेतलेला आहे.मग महाराष्ट्रात EVM मशीनचा हट्ट का?कोणाच्या फायद्यासाठी ही सक्ती? हा प्रश्न आज सामान्य मतदार विचारत आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती या ग्रामीण लोकशाहीच्या कणा आहेत.या निवडणुकांबाबत जर संशय,अविश्वास आणि गैरव्यवस्थेचे वातावरण राहिले, तर त्याचे गंभीर परिणाम राज्याच्या लोकशाही आरोग्यावर होतील.त्यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका बॅलेट पेपरद्वारेच घेण्यात याव्यात,ही जनभावना आहे.या जनभावनेचा आदर करून आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात.असे नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री; एसटीच्या तिकीट दरात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्य परिवहन प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटी बसेसच्या भाडेवाढीच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. आखाती देशांतील युद्धामुळे इंधनाच्या किंमतीत...

आता राज्यातील रुग्णालयांत इच्छामरणासाठी विशेष वैद्यकीय समित्या होणार स्थापन; शासन निर्णय जारी..

उद्रेक न्युज वृत्त :-जेव्हा एखादी व्यक्ती अत्यंत गंभीर व्याधीने ग्रस्त आणि दीर्घकाळ बेशुद्धावस्थेत राहते, तेव्हा अशी व्यक्ती स्वतः निर्णय घेऊ शकत नाही.अशा वेळी मरण...

महामार्गाच्या मध्यभागी आलेले पाणीपुरवठा योजनेचे चेंबर धोकादायक; संबंधित विभागाचे दुर्लक्ष.. – रविंद्र गोटेफोडे यांची तातडीने स्थलांतराची मागणी

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा शहरातून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४३ च्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे चेंबर थेट रस्त्याच्या मध्यभागी आल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला...

सर्पदंश झाल्यास काय करावे आणि काय करू नये,घ्या जाणून.. – गडचिरोली जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत एकूण १३४ सर्पदंशाच्या घटनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पावसाळ्याच्या दिवसांत शेतीची कामे वाढल्यामुळे आणि बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे सापांचा मानवी वस्तीत व शेतात वावर वाढतो.गडचिरोली जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र व जंगलाचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!