- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचे येत्या २१ डिसेंबरला मतदानाचे निकाल घोषित होणार आहेत. अश्यातच आता पुढील महानगर पालिका तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे.त्यानुसार,आज,सोमवार १५ डिसेंबरला राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे दुपारी ४ वाजता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सह्याद्री अतिथिगृह येथे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.सदरची पत्रकार परिषद मुंबईमधील मलबार हिल येथील सह्याद्री अतिथिगृहामध्ये दुपारी ४ वाजता पार पडणार आहे.
माहितीनुसार,सर्वप्रथम राज्यातील २९ महानगर पालिकांच्या निवडणुका पार पडणार असून दोन महापालिकांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. नागपूर,चंद्रपूर या दोन महापालिकांची निवडणूक आरक्षण मर्यादेच्या मुद्यामुळे नंतर होईल आणि अन्य २७ महापालिकांची निवडणूक एकत्रित होईल,असे म्हटले जात असले तरी सर्व २९ महापालिकांची निवडणूक एकाच टप्प्यात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. साधारणतः जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात त्यासाठीचे मतदान होईल,असे म्हटले जात आहे.नागपूर आणि चंद्रपूर या दोनच महापालिका अशा आहेत की,जिथे ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे.त्यामुळे येथे आधी ५० टक्क्यांच्या आत आरक्षण दिले जाईल, अशा पद्धतीने पुनर्रचना करून मगच तेथे निवडणूक घेतली जाईल,असा तर्क होता.मात्र, आयोगाच्या सूत्रांनी त्यास नकार दर्शवून ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेली आहे,अशा ठिकाणी निवडणूक घेऊ नये,असे न्यायालयाने निकालात कुठेही म्हटलेले नाही.ही मर्यादा ओलांडलेल्या महापालिकांमध्ये निवडणूक घेता येईल आणि निकालदेखील जाहीर करता येईल; पण हा निकाल ओबीसी आरक्षण आणि ५० टक्क्यांची ओलांडलेली मर्यादा याबाबत न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या अधीन असेल. त्यामुळे सर्व २९ महानगर पालिकांमध्ये निवडणुका पार पडणार असल्याचे स्पष्ट झाले.

- Advertisement -

