- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-ज्यांच्या नावे कुठल्याही प्रकारची शेती नाही तसेच ज्यांचे अतिवृष्टीत पिकांचे नुकसान झाले नाही, अश्या बनावट व्यक्तींच्या नावावर तब्बल ४ लाख १८ हजार ६९० रूपये इतके अनुदान लाटण्याचा प्रकार उघडकीस येताच चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांनी पोंभुर्णा तालुक्यातील आदर्श ग्राम घाटकूळ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक खुशाब मानपल्लीवार यांना निलंबित केले आहे.
शासनाकडून वर्ष २०२३-२४ मध्ये अतिवृष्टी व पीक नुकसानीचे पंचनामे करून पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना लाभ देण्याकरिता अनुदान मिळाले होते.त्यानुसार, पंचनामे तयार करण्यात आले.मात्र,घाटकूळ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक खुशाब मानपल्लीवार यांनी
शेती पंचनाम्यातील गैरव्यवहार प्रकरणात सातबारा नसलेल्या ९ अपात्र लाभार्थ्यांसाठी चुकीचे पंचनामे तयार केले.विशेष म्हणजे,ज्यांच्या नावावर शेती नाही, अश्यांनाही तसेच तालुक्याबाहेरील व्यक्तींच्या नावावर बनावट सातबारे तयार करून वाढीव आराजी दाखवली व त्यांना शासकीय अनुदान दिल्याचा बनाव करून स्वतःच अनुदान लाटले.याबाबत सुजाण नागरिकांनी तक्रार नोंदवली.प्रकरणाची चौकशी झाली आणि चौकशीअंती पीक नुकसानीच्या पंचनाम्यात मोठा गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाल्याने घाटकूळ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक खुशाब मानपल्लीवार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
- Advertisement -

