- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-रेल्वेच्या धडकेत वन्यप्राण्यांच्या मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.यावर ठोस उपाययोजना करण्यात शासन निष्फळ ठरत असल्याने वन्यप्रेमींकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.अश्यातच रूळ ओलांडताना मालगाडीची धडक बसल्याने एका वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना बल्लारशहा-सिकंदराबाद डाऊन रेल्वे मार्गावरूळ राजुरा तालुक्याच्या चनाखा रेल्वे रुळाजवळ घडली.सदरची बाब काल रविवारी सकाळच्या सुमारास उघडकीस येताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकारी तसेच वन विभागास माहिती दिली.त्यानुसार,राजुराचे उपविभागीय वनाधिकारी एम.डी.गिरडकर,राजुराचे वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन इंगळे यांनी घटनास्थळी दाखल होत चौकशी केली.शनिवारच्या रात्री विहिरगाव नियत क्षेत्रातील चनाखा उप क्षेत्राच्या कक्ष क्रमांक-१६० परिसराला लागून असलेल्या रेल्वे रुळावरून मालगाडी जात असतांना एक वाघीण रूळ ओलांडतांना तीला रेल्वेने जोरदार धडक दिली.त्यात ती जागीच ठार होऊन वाघीण रेल्वे रूळाचे उजव्या बाजुला पडल्याचे दिसून आले.प्रकरणी वनाधिकाऱ्यांनी पंचनामा करून वाघीणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चंद्रपूर येथे पाठविला.मृत वाघीण ही सात वर्षाची होती. पंचनाम्यादरम्यान वाघिणीचे दात व सर्व अवयव शाबूत असल्याचे वनाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
- Advertisement -

