Thursday, April 30, 2026
Homeकुरखेडाकृषी पंपाच्या १६ तास विद्युत पुरवठा मागणी करीता १५ मार्च ला कुरखेडा...

कृषी पंपाच्या १६ तास विद्युत पुरवठा मागणी करीता १५ मार्च ला कुरखेडा आम आदमी पक्षाचा चक्का जाम आंदोलन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

कुरखेडा :- शेती पंपा करिता दिला जाणारा ८ तासाचा विद्युत पुरवठा वाढवून १६ तास करावे अन्यथा आम आदमी पार्टी रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांच्या हितासाठी तीव्र आंदोलन करेल असा निवेदन काही दिवसांपूर्वी सादर करून शासनास इशारा दिला होता. 

शासन स्तरावरून कुठलेही पाऊल शेतकऱ्यांच्या हितासाठी उचलण्यात न आल्याने येत्या १५ मार्च २०२३ ला गेवर्धा येथे गुरनोली फाट्या जवळ सकाळी ११ वाजता पासून रास्ता रोको आंदोलन करून चक्का जाम करणार असल्याचे पत्र कुरखेडा आम आदमी पक्षाच्या वतीने कुरखेडा तहसीलदार व पोलीस ठाण्यातील प्रमुख यांना सादर केलेला आहे.

कूरखेडा तालुक्यात दिला जाणार कृषी पंप विद्युत पुरवठा केवळ ८ तास दिला जात आहे.यामुळे उन्हाळी पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची शेत पिके करपण्याच्या स्थितीत असल्याने सदर ८ तासाचा विद्युत पुरवठा १६ तास न केल्यास शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला समोर जावे लागेल.यापूर्वी १२ तास विद्युत पुरवठा असल्याने शेतकऱ्यांनी दुबार पेरणीचे धाडस केले.परंतु मागील एक महिन्यापासून कृषी जोडणी असलेल्या विद्युत पंपांना केवळ ८ तास वीज मिळत असल्यामुळे आवश्यकतेप्रमाणे शेतातील पिकांना पाणी देणे शक्य होत नाही.त्यामुळे शेतकऱ्यांचे पीक करपण्याच्या स्थितीत असून कृषी पंपाचा वीज पुरवठा १६ तास न केल्यास शेतकरी बांधवांचे पीक करपून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.उद्योग नसलेल्या जिल्हा व मागासलेली स्थिती असलेल्या या भागात शेती हे एकमेव रोजगाराचे साधन आहे. त्यातच वीजपुरवठा केवळ ८ तास झाल्यास शेती कशी पिकवायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा येऊन ठाकला आहे.

सदर अन्यायपूर्ण बाबीचा पुनर्विचार करावा व शेतकरी बांधवांच्या कृषी पंपा करिता १६ तास वीज पुरवठा करण्यासाठी योग्य तो निर्णय घ्यावा; या मागणी करिता व शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्याया विरोधात आम आदमी पार्टीने शेतकरी हितार्थ रस्त्यावर उतरून येत्या १५ मार्चला आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बच्चू कडूंनी धनुष्यबाण घेतला हाती; शेतकरी,मजूर,दिव्यांगांसाठी निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दिव्यांग,शेतकरी आणि गोरगरिबांसाठी लढणारा 'रॉबिनहूड' नेता माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री...

शहरी भागात क्युआर कोड असलेली विवाह प्रमाणपत्रे द्या.. – देसाईगंज भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सध्या स्थितीत अनेक शासकीय कागदपत्रे ऑनलाइन आणि सुरक्षित केली जात आहेत.यात विवाह नोंदणी प्रमाणपत्राचाही समावेश आहे.विवाह नोंदणी प्रमाणपत्राला विशेष...

नक्षलमुक्तीचा ठेवा..! स्वातंत्र्यानंतर तब्बल ७७ वर्षात प्रथमच जिल्हाधिकारी गडचिरोलीच्या दुर्गम भागात..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या टोकावर वसलेल्या व छत्तीसगडच्या सीमेवरील अत्यंत दुर्गम व नक्षल प्रभावित भामरागड तालुक्याच्या बीनागुंडा आणि लाहेरी या भागात स्वातंत्र्यानंतर तब्बल ७७...

पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘जीवनदायिनी’.. गडचिरोली जिल्ह्यात ३१ रुग्णांना तब्बल ३१ लाख ३५ हजार रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘आधार’ ठरत आहे.गडचिरोली जिल्ह्यात आर्थिक वर्षात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!