उद्रेक न्युज वृत्त :- ‘रोजगार हमी काम कमी अन् दुखणा जास्त’ असे असले तरीही ग्रामीण भागातील कामगारांना रोजगार मिळून उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध होत आहे. अश्यातच बऱ्याच ठिकाणी रोजगार हमीच्या कामांवर बोगस मजूर तसेच गैरप्रकार उघडकीस आल्याने सरकार वेगवेगळे प्रयोग करून आळा घालण्याचा प्रयत्न करीत आहे.मात्र,गैरप्रकार करणारे सरकारच्या चार पट दिमाक लावून पायवाटा शोधत असतात.त्यातच शासनाने पुन्हा एकदा बोगस मजूर तथा गैरप्रकार रोखण्यासाठी नवीन फंडा सुरू केला आहे.नव्या प्रयोगात रोजगार हमीच्या कामांवर जाणाऱ्या मजुरांची उपस्थिती आता चेहऱ्याचे स्कॅन करून केली जात आहे.रोजगार हमी योजनेच्या पोर्टलवरील एनएमएमएस प्रणाली वापरून कामगारांची उपस्थिती आता फेस ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून नोंदवली जाणार आहे.काम सुरू होण्यापूर्वी मजुराचा फोटो एनएमएमएस ॲपद्वारे घेतला जाईल आणि तो आधार डेटाशी त्वरित जुळवला जाईल.ज्या मजुरांची ओळख यशस्वीरित्या जुळेल,त्यांचीच उपस्थिती मान्य केली जाणार आहे.या उपक्रमामुळे रोजगार हमी योजनेत अनेक वर्षांपासून दिसणाऱ्या त्रुटींना आळा बसून योजना अधिक प्रभावी,पारदर्शक आणि जबाबदार पद्धतीने राबवली जाईल.या नव्या प्रणालीमुळे रोजगार हमी योजनेतील बोगस कामगार व गैरप्रकारांना आळा बसून पारदर्शकता वाढेल.केवळ पात्र आणि प्रत्यक्ष काम करणाऱ्या मजुरांनाच मजुरी मिळेल,असे शासनाचे म्हणणे आहे.एखाद्या मजुरांनी अद्याप आपली ई-केवायसी पूर्ण केली नसेल,तर त्यांची उपस्थिती पुढे नोंदवली जाणार नाही.त्या-त्या गावातील मजुरांनी सदरच्या प्रक्रियेसाठी रोजगार सेवकांशी संपर्क साधावा,असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
सरकार नवनवीन प्रयोग आणतोय; पण.. आता रोजगार हमी योजनेतील मजुरांची उपस्थिती चेहऱ्याचे स्कॅन करून..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

