Sunday, April 19, 2026
Homeनागपूर२० वर्षीय तरुणाचा पोहण्याच्या नादात तलावात बुडून मृत्यू..

२० वर्षीय तरुणाचा पोहण्याच्या नादात तलावात बुडून मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-तलाव व नद्यांचे वाढते आकर्षण शहरी तरुणांसाठी जीवघेणे ठरू लागले आहे.शिक्षणासह नोकरी करणारे पाच तरुण सुट्टी असल्याने काल,शनिवार २६ जुलै रोजी सकाळच्या सुमारास हिंगणा शहरापासून १० किलोमिटर अंतरावर असलेल्या सालईमेंढा शिवारातील तलावाच्या काठी फिरायला गेले होते. परिसरात काही वेळ फेरफटका मारल्यानंतर पाच पैकी चौघे पोहण्यासाठी तलावात उतरले.खोल पाण्यात गेल्याने यातील एक जण व त्याचा मित्र गटांगळ्या खाऊ लागले.उर्वरित दोघांनी एकाला पकडून तलावातून बाहेर काढले.मात्र,यात २० वर्षीय तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाला.पीयूष सूरज सुखदेवे वय २० वर्षे,रा.भिलगाव,ता.कामठी असे तलावात बुडून मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. पीयूष व त्याचे मित्र मृणाल विमेश उके वय २० वर्षे, हर्ष सिद्धार्थ थुलकर वय १९ वर्षे दोघेही रा. कपिलनगर,नागपूर,करण लक्ष्मण चौधरी वय १८ वर्षे, रा.बाराखोली,जरीपटका,नागपूर व क्रिश प्रकाश स्वामी वय १९ वर्षे, रा.रेल्वे क्वार्टर,मोतीबाग,नागपूर हे पाचही मित्र फिरायला गेले होते.पीयूष तलावात बुडताच घाबरलेल्या मित्रांनी लगेच पोलिसांना सूचना दिली.ठाणेदार जितेंद्र बोबडे व सहकारी पोलिसांनी पीयूषचा शोध घेण्यासाठी स्थानिक तरुणांची मदत घेतली.मात्र,पियूषचा मृतदेह सापडत नसल्याने त्यांनी
नागपूर महानगरपालिका व हिंगणा तालुक्याच्या वानाडोंगरी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले.त्यांनी बोटीद्वारे पीयूषचा पाण्यात शोध घेत पाच तासांनी मृतदेह बाहेर काढला.यावेळी पीयूषचे वडील सूरज सुखदेवे,मामा अमर तागडे व नातेवाईक घटनास्थळी उपस्थित होते.पियूषचा मृतदेह पाहून एकच आक्रोश केला. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.हिंगणा तालुक्यातील मोहगाव (झिल्पी) व सालईमेंढा तलाव धोकादायक ठरत असल्याने तलावात कुणीही उतरू नये,अश्या सूचनांचे जागोजागी फलक लावले आहेत. मात्र,तरुण मंडळी या सूचनांकडे दुर्लक्ष करतात आणि अमूल्य जीवन नष्ट करतात.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची; सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू ठेवण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अश्यातच चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाची...

चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच उडाला भडका; पतीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-स्वयंपाकघरातील गॅस लिकेज असल्याने चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच आगीचा अचानकपणे भडका उडाला आणि काही क्षणातच सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला.दरम्यान,संपूर्ण घरात...

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!