उद्रेक न्युज वृत्त :-पीएम किसान योजनचे जून महिन्यात जमा होणारे २ हजार रुपये महिना संपूनही मिळाले नसल्याने राज्यातील शेतकरी बांधव दोन हजाराची आतुरतेने वाट पाहत आहेत.अश्यातच आता पीएम किसान योजनेच्या २ हजाराची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार असल्याची माहिती आहे.याबाबत अद्याप अधिकृत घोषणा शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेली नसली तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १८ जुलै रोजी बिहारमधील मोतिहारीला भेट देणार आहेत.अशा परिस्थितीत,या काळात पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता जारी केला जाऊ शकतो.विशेष म्हणजे,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेचा मागील १९ वा हप्ता हा २४ फेब्रुवारी २०२५ रोजी बिहारमधील भागलपूर येथील एका कार्यक्रमातून जारी केला होता.त्यानुसार देशातील ९ कोटी ८० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी २ हजार रुपये जमा करण्यात आले होते. त्यातच आता जून महिना संपून जुलै महिना लागला आहे.त्यामुळे येत्या पुढील काही दिवसांत पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
पीएम किसान योजनेच्या २ हजाराची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

