Sunday, April 19, 2026
Homeनागपूरभाजपचे नेते निवडणुक आयोगाचे वकील आहेत का? - नाना पटोलेंचे टीकास्त्र..

भाजपचे नेते निवडणुक आयोगाचे वकील आहेत का? – नाना पटोलेंचे टीकास्त्र..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-पुन्हा एकदा विधानसभेच्या निकालावरून काँग्रेसचे घमासान सत्र सुरू झाले असून भाजपचे नेते निवडणुक आयोगाचे वकील आहेत का? असे नाना पटोलेंनी टीकास्त्र उगारले आहे.ते नागपुरात माध्यमांशी बोलतांना म्हणाले की,नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः निवडणूक आयोगाची बाजू मांडली.आताही फडणवीस, बावनकुळे हे निवडणूक आयोगाची बाजू मांडत आहेत.भाजपचे नेते निवडणुक आयोगाचे वकील आहेत का? शिर्डी मतदारसंघात सत हजार मतदार कसे वाढवले याचे पुरावे आहेत.ज्या मतदारसंघात मतदारांची जेवढी मतदार संख्या बोगस पद्धतीने वाढविली तेवढेच मताधिक्य त्या मतदारसंघात भाजपला मिळाले आहे.आम्ही पुराव्यानिशी मतदारयाद्यातील घोटाळा व बोगस मतदान दाखवतो, हिम्मत असेल तर भाजपा नेत्यांनी ते खोडून दाखवावे,असे आव्हान पटोले यांनी केले आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भाजपने दरोडा टाकत निवडणूक आयोगाच्या मदतीने विजय मिळवला,असा आरोप काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केला आहे.तसेच राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर निवडणूक आयोग पुराव्यासह खुलासा का करत नाही? असा सवालही पटोले यांनी उपस्थित केला आहे.नाना पटोले म्हणाले,निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता ५८.२२ टक्के मतदान झाले, त्याच रात्री ११.३० वाजता ते ६५.०२ टक्के तर दुसऱ्या दिवशी २१ नोव्हेंबर रोजी हेच मतदान ६६.०५ टक्के झाल्याचे सांगितले,यात एकूण ७.८३ टक्के वाढ झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.तब्बल ७६ लाख मतांची ही वाढ असून मतदानाचा टक्का कसा वाढला? हा मतांवर सरळ सरळ दरोडा टाकलेला आहे.
पुढे बोलतांना नाना पटोले म्हणाले,चंदिगड महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतपत्रिकेत कसा घोटाळा करून भाजपाला विजयी घोषित केले होते हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून जगाने पाहिले आहे.वाराणसी लोकसभा मतदारसंघात सुरुवातीपासूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर होते.नंतर यंत्रणा कामाला लागली व निकाल वेगळा लागला,हे उघड झाले आहे. निवडणूक काळात भाजपच्या मर्जितील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना कशी जबाबदारी दिली हेही उघड आहे. भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीने निवडणूक जिंकलेली आहे.लोकशाहीला हा कलंक असून निवडणूक आयोगाच्या विश्वासाहर्तेवरही मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहे.असे पुन्हा एकदा विधानसभेच्या मुद्यांवरून नाना पटोलेंनी टीकेची तोफ डागली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची; सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू ठेवण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अश्यातच चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाची...

चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच उडाला भडका; पतीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-स्वयंपाकघरातील गॅस लिकेज असल्याने चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच आगीचा अचानकपणे भडका उडाला आणि काही क्षणातच सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला.दरम्यान,संपूर्ण घरात...

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!