- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-छतीसगड,गडचिरोली नंतर आता झारखंडच्या बोकारो जिल्ह्यातील लुगू आणि झुमरा टेकडी परिसरात आज,सोमवार २१ एप्रिलला पहाटे साडेपाचच्या सुमारास तब्बल अडीच तास सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली.चकमकीत ८ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून शोधमोहीम सुरूच आहे.त्यामुळे नक्षलवाद्यांच्या मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.तसेच घटनास्थळावरून दोन इन्सास रायफल, एक एसएलआर,एक पिस्तूल आणि ८ देशी बनावटीच्या रायफल जप्त करण्यात आल्या आहेत.
केंद्रीय राखीव पोलीस दल आणि जिल्हा पोलिस दल यांना लुगू आणि झुमरा टेकडी परिसरात नक्षलवादी लपून बसल्याची गुपित माहिती मिळाली होती. त्यानुसार आज सोमवारी शोधमोहीम राबवित असतांना नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला.नक्षलवाद्यांच्या प्रत्युत्तरात सुरक्षा दलांनिही गोळीबार सुरू केला.कारवाईत केंद्रीय राखीव पोलीस दलाची २०९ कोब्रा बटालियन आणि राज्य पोलिस सहभागी होते.सुरक्षा दलाचा वाढता प्रभाव पाहून नक्षलवाद्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. शोधमिहिमेदरम्यान,८ नक्षलवाद्यांचे मृतदेह हाती लागले असून अन्य नक्षलींची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.यात १ कोटी रुपयांचे बक्षीस असलेला नक्षलवादी विवेक देखील चकमकीत मारला गेल्याचे झारखंडचे डीजीपी यांचे म्हणणे आहे.सद्या चकमक थांबली असून शोधमोहीम सुरू आहे.
- Advertisement -

