Friday, August 28, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तभरपाईसाठी चक्क जील्ह्याधिकाऱ्यांच्या खुर्चीवरही जप्तीची कारवाई..

भरपाईसाठी चक्क जील्ह्याधिकाऱ्यांच्या खुर्चीवरही जप्तीची कारवाई..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-रत्नागिरी शहरानजीकच्या भाट्ये समुद्र किनारी असलेल्या रत्नसागर हॉटेल संदर्भात ९ कोटी २५ लाख रुपयांच्या भरपाईबाबत जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची तसेच केबीनमधील साहित्याच्या जप्तीला जिल्हा न्यायालयाने काल बुधवारी पुन्हा एकदा स्थगिती दिली.आता यावरील पुढील सुनावणी ११ जून २०२५ रोजी घेण्यात येणार आहे.
काय आहे प्रकरण?👇
रत्नागिरीतील समुद्रकिनाऱ्यावरील भाट्ये रत्नसागर हॉटेलसंदर्भातील वाद निर्माण झाला आहे. राज्य शासनाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाशी येथील जागेचा ३० वर्षांसाठी करार केला होता. त्या नंतर एमटीडीसीने रत्नसागर हॉटेलच्या संचालकांना २००८ मध्ये दहा वर्षांच्या करारावर जागा भाडेपट्ट्याने दिली होती. ही मुदत २०१८ मध्ये संपली होती. शासन आणि एमटीडीसीमधील करार २०२० मध्ये संपला.याच जागेसंदर्भात एमटीडीसीने शासनाकडे जागेच्या कराराची मुदत वाढवण्यासाठी अर्ज केला होता. परंतु त्यावर निर्णय झाला नव्हता. त्यामुळे १६ डिसेंबर २०२० मध्ये अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी रत्नसागर रिसॉर्टच्या गेटला टाळे ठोकत जागा ताब्यात घेतली होती.या संदर्भात रत्नसागर रिसॉर्टच्या संचालकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.त्यानंतर न्यायालयाने लवाद नेमला होता.या लवादामध्ये यावर खटला चालला रत्नसागरच्या संचालकांनी दाखल केलेल्या मागणीनुसार त्यांना लवादाने ७ कोटी ५ लाखांची नुकसान भरपाई,२ कोटी व्याज व अन्य इतर उत्पन्न बुडाले म्हणून २० लाख असे ९ कोटी २५ लाख देण्याचे आदेश दिले होते.शुक्रवार ४ एप्रिल रोजी न्यायालयाचे बेलीफ आणि रिसॉर्टचे संचालक हे जिल्हाधिकारी कार्यालयात कारवाईसाठी दाखल झाले होते.यावेळी जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची,संगणक व साहित्य जप्त करण्यासाठी पंचयादीही घालण्यात आली.कारवाई सुरु असतांनाच, जिल्हाधिकाऱ्यांच्या-वतीने प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी न्यायालयात जात जिल्हा न्यायालयाकडे या कारवाईला स्थगिती मिळावी म्हणून अर्ज दाखल केला होता.यावर सरकारी वकील ॲड.अनिरुध्द फणसेकर यांनी जिल्हा न्यायालयात महसूल विभागाची बाजू मांडली.त्यानंतर जिल्हा न्यायालयाने जप्तीच्या कारवाईला काल,बुधवार १६ एप्रिलपर्यंत स्थगिती दिली होती. काल बुधवारी या स्थगितीची मुदत संपल्यामुळे पुन्हा एकदा जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी जीवन देसाई न्यायालयात उपस्थित होते.त्यानुसार आता यावरील पुढील सुनावणी ११ जून २०२५ रोजी होणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!