Saturday, August 29, 2026
Homeनागपूरवाहतूक पोलिसांना मोबाइल फोनने फोटो काढून चालान करण्याची मान्यताच नाही.. -...

वाहतूक पोलिसांना मोबाइल फोनने फोटो काढून चालान करण्याची मान्यताच नाही.. – माहितीचा अधिकार अर्जाद्वारे उघड..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचे मोबाइल फोनने वाहतूक पोलिस फोटो काढतात.परंतु असे फोटो काढण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची मान्यताच नसल्याची माहिती खुद्द वाहतूक पोलिसांनी माहितीच्या अधिकारात दिली आहे.तरीदेखील वाहतूक पोलिस सर्रास वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचे मोबाइलमध्ये फोटो काढत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
वाहन चालवितांना अनेक वाहनचालक ट्रिपल सीट वाहन चालवितात.काही वाहनचालक सिग्नल तोडून पुढे जातात तर काहीजण भरधाव वेगाने वाहन चालवितात.अनेकदा वेड्यावाकड्या पद्धतीने वाहन चालविण्यात येतात.अशा वाहनचालकांचे फोटो चौकात उभे असलेले वाहतूक पोलिस आपल्या मोबाइलमध्ये बंदिस्त करतात.त्यानंतर हे फोटो अपलोड करून संबंधित वाहनचालकांना चालान पाठविण्यात येते.याबाबत वर्धमाननगर येथील आशापुरा अपार्टमेंटमधील तिलक खंगार यांनी लकडगंज वाहतूक पोलिसांना माहितीच्या अधिकारात प्रश्न विचारला होता.यात वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीचे वाहतूक पोलिसांद्वारे मोबाइल फोनने फोटो काढण्यास वरिष्ठ कार्यालयाद्वारे मान्यता आहे की नाही,अशी विचारणा करण्यात आली होती. त्यावर लकडगंज वाहतूक परिमंडळाच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीचे वाहतूक पोलिसांद्वारे मोबाइल फोनने फोटो काढण्यास वरिष्ठ कार्यालयाद्वारे मान्यता नसल्याची माहिती पुरविली होती.
वरिष्ठ कार्यालयाची मान्यता नसतांना वाहतूक पोलिस अद्यापही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचे मोबाइलद्वारे फोटो काढत असल्यामुळे तिलक खंगार यांनी पोलिस आयुक्त कार्यालयात २५ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रथम अपील दाखल केले आहे.यात वाहतूक पोलिस कोणत्या अधिकारात हे फोटो काढत आहेत, अशी विचारणा करण्यात आली आहे.परंतु अद्याप आपल्याला माहिती मिळाली नसल्याचे खंगार यांनी सांगितले.वरिष्ठ कार्यालयाद्वारे मान्यता नसतांनादेखील अद्यापही वाहतूक पोलिस वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचे मोबाइलद्वारे फोटो काढत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गरोदर मातेला नेले झोळीतून; घटनेनंतर प्रशासनाला आली जाग.. -आता कोईदूळ नाल्यावरील पुलाचा प्रश्न मार्गी लागणार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील कोईदूळ गावातील रहिवासी छाया सुरेश नैताम वय २६ वर्षे यांना आज,शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास प्रसूती कळा सुरू...

सोशल मीडियावर जातीवाचक वक्तव्य करणे कराळे मास्तरला चांगलेच भोवले; अटक करून कारागृहात रवानगी..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-वर्ध्यातील 'फिनिक्स अकॅडमी'चे संचालक, सामाजिक कार्यकर्ते तथा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असलेले कराळे मास्तर यांना सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाविषयी जातीवाचक वक्तव्य...

आता मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची जबाबदारी नेमकी कोणाकडे? -तसेही “सरपंच-प्रशासक” बिन पगारी अन् फुल्ल अधिकारीच..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शासनाने गावगाडा हाकणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मोठा दिलासा देत शनिवार २१ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली वा...

राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या अंगरक्षकावर महिलेचा लैंगिक शोषणाचा आरोप; पोलिसांत गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे वित्त व नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधि व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या ३८ वर्षीय अंगरक्षकाने(पोलीस कर्मचारी)एका विवाहित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!