Sunday, July 12, 2026
Homeनागपूररोजगार सेवकांच्या मागण्या मान्य न केल्यास उद्यापासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा.....

रोजगार सेवकांच्या मागण्या मान्य न केल्यास उद्यापासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा.. – रोजगार हमी योजनेच्या आयुक्तांना निवेदन सादर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-ग्राम रोजगार सेवक संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी ग्रामीण रोजगार हमी योजनेचे आयुक्त रवींद्र ठाकरे यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. शासनाने रोजगार सेवकांच्या मागण्या मान्य न केल्यास उद्या,मंगळवार १ एप्रिलपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
ग्राम रोजगार सेवकांचे पदनाम बदलून ग्राम रोजगार सहाय्यक करण्यात आले.तसेच एकत्रित मानधन, एकत्रित प्रवास भत्ता ३ ऑक्टोंबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार १ ऑक्टोंबर २०२४ पासून लागू झाला. या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आयुक्त नागपूर यांनी २१ ऑक्टोंबर २०२४ व १९ मार्च २०२५ ला मानधन वितरणाबाबत मार्गदर्शन मागविले आहे.परंतु अजूनही राज्य शासनाकडून मार्गदर्शन करण्यात आले नाही.मागील सहा महिन्यांपासून ग्राम रोजगार सेवक, सहाय्यकांना मानधन न मिळाल्यामुळे त्यांच्यावर हलाखीची परिस्थिती निर्माण झाली आहे.या विषयाची गंभीरता लक्षात घेता शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी,अन्यथा ३१ मार्च २०२५ पर्यंत ग्राम रोजगार सेवक यांच्या मानधन वितरण प्रक्रियेबाबत अंमलबजावणी न झाल्यास १ एप्रिलपासून राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येईल व शासनाच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत चालू असलेल्या अपूर्ण कामांमध्ये हयगय व नुकसान झाल्यास सर्व जबाबदारी शासनाची राहील,असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतांना ग्राम रोजगार सेवक संघटनेचे महासचिव राजेंद्र जिचकार,उपाध्यक्ष वासुदेव गोतमारे, राहुल शेंडे,धीरज अंजनकर,रामगोपाल ढोबळे,मिलिंद मांगे,राहुल गजभिये,राहुल चिमोटे,श्याम डाखोळे, रामेश्वर शेटे आदी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सिंदेवाहीत माकडांची दहशत कायम; दोन दिवसांत दोन जणांवर हल्ले,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरात माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला असून दोन दिवसांत दोन नागरिकांवर हल्ले झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वनविभागाने...

राज्यात ‘किलकारी’ उपक्रमात वर्धा पहिल्या,चंद्रपूर दुसऱ्या,वाशीम तिसऱ्या तर गडचिरोली चौथ्या स्थानावर..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत गरोदर माता,माता आणि बालकांच्या आरोग्याविषयी डिजिटल साक्षरता व जनजागृती करणाऱ्या ‘किलकारी’(Kilkari Mobile Audio Services)उपक्रमात...

वाघाच्या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी; वाघाची पाठीमागून झडप..

उद्रेक न्युज वृत्त  नागभीड(चंद्रपूर):-गावाजवळच्या परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या एका गुराख्यावर वाघाने प्राणघातक हल्ला चढवून गुराख्यास गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना आज,रविवार १२ जुलै रोजी दुपारी...

आता कळलेय भावा? अवैध दारू बंद कां होत नाही तर.. – दारू पुरवठा करणाऱ्यांना मिळतोय ठेका; वाचा संपूर्ण करून कहाणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून दारू बंदीचा धिंडोरा पिटण्यात येत आहे.पण, खरोखरच दारू बंद झाली काय?आज कित्येक गावांमध्ये देशी,विदेशी, गावठी मोहफुलाची दारू व थंडगार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!