Sunday, September 6, 2026
Homeगडचिरोलीई-केवायसी न केल्यास राशन होणार बंद..! - गडचिरोली जिल्ह्यात ३ लाखाच्या वर...

ई-केवायसी न केल्यास राशन होणार बंद..! – गडचिरोली जिल्ह्यात ३ लाखाच्या वर सदस्यांची ई-केवायसी प्रलंबित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-शासनाच्या आदेशानुसार सर्व अंत्योदय व प्राधान्य योजनेच्या सर्व शिधापत्रीकाधारकांनी आपल्या शिधापत्रीकेमधील सर्व सदस्यांची ई-केवायसी करणे आवश्यक आहे.यासाठी विशेष मोहीम सुरु असुन,येत्या २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत ई केवायसी न केल्यास,धान्य मिळणार नाही.यासाठी सर्व शिधापत्रीकाधारकांनी रास्तभाव दुकानात जावून ई-केवायसी करावी,असे आवाहन गडचिरोली जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील यांनी केले आहे. तसेच नो नेटवर्क झोनमधील गावाकरीता,नेटवर्क असलेल्या ठिकाणी विशेष कॅम्प आयोजीत करुन ई-केवायसी करुन घेण्याबाबत तहसिलदार यांना आदेश देण्यात आले आहेत.
ई-केवायसी प्रक्रिया करण्यासाठी रास्तभाव दुकाने पुर्णवेळ सुरु ठेवावी.जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून प्रत्येक महिण्यातील १ तारखेपर्यंत जिल्ह्यातील सर्व रास्तभाव धान्य दुकानात,लाभार्थ्यांकरीता धान्य उपलब्ध करुन देण्यात येते.प्रत्येक महिण्याच्या ७ तारखेला अन्नदिवस साजरा केला जातो,त्या दिवसापर्यंत जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी धान्याची उचल करावी.तसेच ७ ते १५ तारखेपर्यंत अन्न सप्ताह साजरा केल्या जातो.त्यामुळे १५ तारखेपर्यंत रास्तभाव धान्य दुकानामधुन १०० टक्के लाभार्थ्यांनी धान्याची उचल करावी,असेही जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी आवाहन केले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य योजनेच्या गटातील शिधापत्रीकाधारकांना मोफत रेशनधान्य देण्यात येते,यासाठी सर्व लाभार्थ्यांची आधारशी निगडीत ई केवायसी रास्तभाव धान्य दुकानात होणे बंधनकारक आहे.’वन नेशन वन रेशन’ उपक्रमात देशभरात ज्या ठिकाणी लाभार्थी धान्य घेत आहेत.त्याच दुकानात त्यांची ई-केवायसी होणे अनिवार्य आहे.गडचिरोली जिल्ह्यात अंत्योदय व प्राधान्य योजनेच्या एकुण २२३९०५ शिधापत्रीका असुन ८४१८५१ सदस्य आहेत.त्यापैकी ५२१७१५ सदस्यांची इ-केवायसी पूर्ण झाली आहे.उर्वरीत ३२०१३६ शिधापत्रीकेतील सदस्यांची ई-केवायसी प्रलंबित आहे.त्यामुळे प्रलंबित असलेल्या सदस्यांनी तात्काळ ई-केवायसी करून घ्यावी; अन्यथा राशन मिळणे बंद होणार आहे.
नोंदणीकृत स्थलांतरीत व असंघठीत कामगारांना ई-श्रम पोर्टलवरील नोंदणीनुसार रेशन कार्ड वितरीत करण्यात येणार आहे.ज्या कामगारांकडे अजुनही रेशनकार्ड नाही,त्यांनी तातडीने तहसील कार्यालयामध्ये अर्ज करावा,त्यांना तातडीने रेशनकार्ड वितरीत करण्यात येईल,असे गडचिरोली जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!