- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्यात लोकसभा पाठोपाठ विधानसभा निवडणुका पार पडल्या असून बऱ्याच कालावधीपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित असल्याने सर्वत्र प्रशासक राज असल्याचे दिसून येत आहे.अशातच अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज,मंगळवार २८ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात निर्णय होण्याची शक्यता होती.मात्र,आजच्या सुनावणीत निवडणुकांबाबत कोणताही ठोस निर्णय झाला नसून यासंदर्भातील पुढील सुनावणी २५ फेब्रुवारीला होणार असल्याने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका आणि ओबीसी आरक्षणासंबंधित दाखल याचिकांवर आज मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती कोटिश्वर सिंग यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली.ओबीसी आरक्षणाशी संबंधित प्रकरणांमुळे निवडणुकांबाबत कोणताही निर्णय घेता आला नाही. त्यामुळे जिल्हा परिषद,नगर पंचायती, महानगरपालिकाच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे.
- Advertisement -

