- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-राज्यात लाडकी बहिण योजनेने धूम ठोकली आहे.जुलै २०२४ रोजी सुरू झालेल्या योजनेमुळे अनेक गोर-गरीब महिलांना महिण्याकाठी दीड हजार रुपये खात्यावर मिळू लागल्याने उदरनिर्वाहासाठी एकप्रकारे हातभार लागला आहे.अशातच लाडकी बहिण योजना व संजय गांधी निराधार या दोन्ही योजनांचा लाभ काही महिला घेत असल्याने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला निकष लावले जाणार आहेत.शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या कोणत्याही एकाच योजनेचा लाभ लाभार्थी घेऊ शकणार आहेत.तरीही निराधार योनजेतील अनेक लाभार्थी लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेत आहेत.या योजनेतून संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी वगळण्यात आले आहेत,असे असले तरी काहीजण या दोन्ही योजनेचा लाभ घेऊ नये,यासाठी आता पडताळणी केली जात आहे.यामध्ये लाभार्थ्यांना दोनपैकी केवळ एकाच योजनेचा लाभ घेता येईल.
६५ वर्षांपर्यंतच्या संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थी महिलांना यापैकी कोणत्या योजनेचा लाभ सुरू ठेवायचा याचे स्वयंघोषणापत्र द्यावे लागणार आहे.दरम्यान,संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांची कागदपत्रे जमा करण्यास सांगण्यात आले आहे. वारंवार सूचना करूनही अनेकांनी कागदपत्रे जमा केलेली नाही.सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्यांमध्ये एकूण अर्जापैकी सदोष किंवा मानवी चुकांमुळे त्रुटीयुक्त असण्याची शक्यता आहे.त्यामुळे कागदपत्र जमा करणे आवश्यक आहे.या कागदपत्रांच्या आधारे योजनेच्या लाभार्थ्यांची यादी अपडेट केली जाईल, यातून पात्र नसलेल्यांची नावे वगळली जातील. कागदपत्रच जमा झाले नाही तर अशांना अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ येऊ शकते.लाभार्थी शासनाच्या संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेचे अनुदान घेत आहेत.असे असतांना दुसरीकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचेही अनुदान घेत आहेत,अशांना दोन पैकी एकाच योजनेचे अनुदान मिळेल,दुसऱ्या योजनेचे अनुदान बंद केले जाणार आहे.
- Advertisement -

