- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-फेसबुक फ्रेंडसाठी घरच्यांना सोडून साडेआठशे किलोमीटर दूर आलेली सारिका रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुखरूप तिच्या कुटुंबीयांत पोहोचली.नववीत शिकणारी १६ वर्षीय सारिका (काल्पनिक नाव)ऑनलाइन जगताची सफर करीत असतांना काही दिवसांपूर्वी तिची फेसबुकवर चंद्रपूर जिल्ह्यातील एका तरुणाशी ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर आधी मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाल्यानंतर तिने त्याच्यासाठी कुटुंबीयांचा विश्वासघात केला.त्यांना अंधारात ठेवून सारिकाने शुक्रवारी घर सोडले.तत्पूर्वी तिने मोठ्या प्रमाणात घरातील सोन्याचे दागिने सोबत घेतले आणि अहमदाबाद एक्स्प्रेसने नागपुरात पोहोचली.तिकडे मुलगी बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच आईवडिलांनी सुरत पोलिसांकडे तक्रार नोंदवली.तिचे ‘ओळखी’च्याच व्यक्तीने अपहरण केल्याचेही तक्रारीत नमूद केले.त्यामुळे सुरत पोलिस तिचा शोध घेऊ लागले.इकडे सारिका शनिवारी सायंकाळी नागपुरात पोहोचली.मात्र,तिचा मित्र तिला रेल्वेस्थानकावर घ्यायला आलाच नाही.सामाजिक दायित्व जपणाऱ्या दोन ऑटोचालकांनी अस्वस्थ सारिकाला हेरले आणि रेल्वे पोलिसांना माहिती देऊन तिला पोलिसांच्या स्वाधीन केले.पोलिसांनी सपनाच्या नातेवाइकांशी संपर्क साधला.त्यांना गुजरातहून नागपुरात पोहोचायला वेळ लागणार म्हणून तिला ‘चाइल्डलाइन’च्या माध्यमातून शासकीय वसतिगृहात ठेवले.सोमवारी तिचे आईवडील आणि गडचिरोली येथील नातेवाईक नागपूर रेल्वे पोलिसांकडे पोहोचले.पोलिसांनी कायदेशीर औपचारिकता पूर्ण करून चाइल्डलाइनच्या माध्यमातून सारिकाला तिच्या नातेवाइकांच्या स्वाधीन केले.
रेल्वेस्थानकावर एका टोकाला सारिका कावऱ्याबावऱ्या अवस्थेत शहजाद आणि बादल नामक ऑटोचालकांना दिसली होती.त्यांनी लगेच रेल्वे पोलिसांना माहिती दिली.त्यामुळे सारिका सहीसलामत राहू शकली.ते कळल्यानंतर रेल्वे पोलिसांसोबतच तिच्या पालकांनीही शहजाद आणि बादलचे कौतुक करून त्यांचे आभार मानले.
- Advertisement -

