- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-राज्यातील ग्रामीण भागात गावकरी मजुरांना काम उपलब्ध करून देत तुटपुंज्या मानधनावर राब-राब राबून संसाराचा गाडा हाकणाऱ्या ग्रामरोजगार सेवकांना अद्यापही मानधन मिळाले नसल्याने उपासमारीची पाळी आली आहे.गत अनेक वर्षांपासून ग्रामरोजगार सेवकांच्या मागण्या शासन दरबारी प्रलंबित होत्या.त्या पूर्ण व्हाव्यात म्हणून रोजगार सेवकांनी सातत्याने मोर्चे,आंदोलन करीत शासनाचे उंबरठे झिजविले.अखेर ऑक्टोंबर महिन्यामध्ये राज्य सरकारने ग्राम रोजगार सेवकांना ८ हजार रुपये मानधन,तर दोन हजार रुपये प्रवास भत्ता देण्याची घोषणा केली.मात्र,तीन महिने लोटूनही रोजगार सेवकांना मानधन मिळाले नसल्याने मानधन तर वाढविले,पण मिळणार कधी? असे म्हणण्याची वेळ आली आहे.
राज्यामध्ये कार्यरत असलेल्या प्रत्येक गावच्या ग्रामपंचायतीमध्ये २००८ मध्ये ग्रामरोजगार सेवकांची नियुक्ती करण्यात आली.सुरुवातीच्या काळात ग्रामरोजगार सेवकांना तुटपुंजे मानधन देण्यात येत होते.परंतु,नंतर मागील दहा ते पंधरा वर्षांपासून ग्रामरोजगार सेवकांच्या विविध मागण्यांसाठी राज्यातील रोजगार सेवकांनी तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर आपल्या मागण्यांसाठी शासन दरबारी पाठपुरावा केला.मात्र,प्रदीर्घ लढा लढल्यानंतर राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑक्टोंबर २०२४ मध्ये राज्यातील ग्रामरोजगार सेवकांना दरमहा ८ हजार रुपये मानधन व २ हजार रुपये प्रवास भत्ता देण्याची घोषणा केली. दोन महिन्यांपूर्वी मुंबई येथील रोजगार सेवकांच्या मेळाव्यात घोषणेची अंमलबजावणी करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या.अशातच अजून पर्यंत मानधन तर वाढविले,पण मिळणार कधी? अशी अवस्था झाली आहे.
राज्यात जवळपास २७ हजार ग्रामरोजगार सेवक कार्यरत आहेत.राज्यातील विविध जिल्ह्यात शेकडोच्यावर ग्रामरोजगार सेवक असून मजुरांना रोजगार उपलब्ध करून देत आहेत.अशातच
रोजगार उपलब्ध करून देणारेच ‘उपाशी अन् बाकीचे तुपाशी’ असल्याचे दिसून येत आहे.वेळोवेळी यासंदर्भात मागणी करण्यात येत असली तरी अद्यापही मानधन मिळत नसल्यामुळे ग्राम रोजगार सेवकांच्या मानधनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
- Advertisement -

