- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच काल,बुधवार १ जानेवारी २०२५ रोजी सर्वत्र नवीन वर्षाचा उत्सव साजरा होत असतांना कोंढाळा येथील एका विवाहित महिलेने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी टोकाचे पाऊल उचलले असल्याची घटना काल बुधवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली.नेहा कुलदिप मेश्राम वय २८ वर्षे रा.कोंढाळा, ता.देसाईगंज असे पुलावरून उडी मारलेल्या महिलेचे नाव आहे.
नविन वर्षाची सुरुवात होतांना देसाईगंज शहरासह परिसरात अनुचित घटना घडु नये; यासाठी देसाईगंज पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक संदिप आगरकर हे आपल्या ताफ्यासह देसाईगंज शहराच्या
विर्शी टी-पॉईंट परिसरात सायंकाळच्या सुमारास पेट्रोलिंग करीत होते.अशातच सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास आगरकर यांना देसाईगंज-ब्रम्हपुरी मार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलावरुन महिलेने उडी घेतल्याची मोबाईल फोन वरुन माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न करता संदिप आगरकर ताफ्यासह नदिपात्राजवळ पोहचले.नदिच्या पाण्यात एक महिला वाचवा-वाचवा अशी ओरडत असतांना आगरकर स्व:ता पाण्यात उतरले,त्यांनी महिलेला पाण्याबाहेर काढुन पोलिस गाडीत टाकले व तातडीने ग्रामिण रुग्णालय देसाईगंज येथे दाखल करीत रुग्णालयाचे डॉ.ईकबाल बेग यांनी सदर महिलेवर उपचार सुरु केले.सदर महिलेची ओळख पटल्याने पोलिसांनी तिचे पती कुलदीप मेश्राम यांस सदर घटनेची माहिती देऊन रुग्णालयात बोलावुन घेतले.सदर महिलेच्या कंबरेला व पायाला इजा झाल्याने पुढिल उपचारासाठी गडचिरोली जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले.
नदिपात्रात उडी घेतलेल्या महिलेस पाण्याबाहेर काढतांना देसाईगंज ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संदिप आगरकर यांचेसह पोलीस हवालदार जिवन हेडाऊ,दिनेश राऊत,विलास बालमवार,मोरेश्वर चन्ने,जस्पाल चावला,पंकज मेश्राम यांनी मदत केली.आगरकर तथा देसाईगंज पोलिसांनी घडविलेल्या मानुसकीच्या दर्शनाची सर्वच स्तरातून प्रशंसा केली जात आहे.सदर प्रकरणाचा तपास कुरखेडा उपविभागिय पोलिस अधिकारी रविन्द्र भोसले तथा देसाईगंज पोलिस निरिक्षक अजय जगताप यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप आगरकर करीत आहेत.
- Advertisement -

