- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच’ गडचिरोलीच्या वतीने “आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता” हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते.या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते.या कवितेला “आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी” म्हणून पुरस्कृत करण्यात येते. व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते.या उपक्रमाचे ५० वे व शेवटचे सत्र नुकतेच पार पडले असून यात ४१ कवींनी सहभाग नोंदविला होता.या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून स्पर्धेचे हे ५० वे सत्र असल्याने यावेळी दोन कवींना सन्मानित करण्यात आले आहे. त्यात गडचिरोली जिल्ह्यातील संगीता रामटेके व चंद्रपूर जिल्ह्यातील किशोर बोरकुटे या दोन कवींनी बाजी मारली आहे.
सुप्रसिध्द कवयित्री संगीता रामटेके रा.आरमोरी, जि.गडचिरोली व नवोदित कवी किशोर बोरकुटे रा.कवठी,ता.सावली,जि.चंद्रपूर या दोन कवींची आठवड्याचे उत्कृष्ट कवी म्हणून निवड करण्यात आली असून,त्यांच्या अनुक्रमे “भक्तीभाव” व “बाप” या कवितांची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे.असे नाट्यश्रीचे संचालक तथा नाटककार चुडाराम बल्हारपुरे व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे.
संगीता रामटेके ह्या सुप्रसिध्द कवी असून त्यांचे वेदनेचे काहूर,ह्रदयातील भाव व काव्य संगीता हे तीन काव्यसंग्रह प्रकाशित असून दोन काव्यसंग्रह प्रकाशनाचे मार्गावर आहेत.तर किशोर बोरकुटे हे नवोदित कवी असून त्यांनी नुकतीच कविता लेखनास सुरुवात केलेली आहे.नुकत्याच नाट्यश्रीच्या वतीने प्रकाशित ‘रानगर्भातील रानफुले’ या कविता संग्रहात त्यांच्या दोन कविता समाविष्ट आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्रीचे दादा चुधरी,दिलीप मेश्राम,प्रा.यादव गहाणे व प्रा.अरुण बुरे तसेच नाट्यश्रीच्या सदस्यांनी दोघांचेही अभिनंदन केले आहे.
५० व्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने प्रा.पंढरी बनसोडे, तुळशीराम उंदीरवाडे,संतोष कपाले,माधुरी अमृतकर, संगीता ठलाल,उकंडराव नारायण राऊत,गजानन गेडाम,वंदना सोरते,रोहिणी पराडकर,अजय राऊत, पुनाजी कोटरंगे, प्रियंका ठाकरे,पी.डी.काटकर,विलास टिकले,कु.विधी बन्सोड,अतुल के.गंडाटे,वामनदादा गेडाम,जयराम धोंगडे,मुर्लीधर खोटेले,मंदाकिनी चरडे, सुभाष धाराशिवकर,डॉ.मंदा पडवेकर,विलास जेंगठे,यामिनी मडावी,कु.भावना रामटेके,सुरज गोरंतवार,किशोर बोरकुटे,रंजना चुधरी,राजेंद्र यादवराव सोनटक्के,संगीता रामटेके,ज्योती म्हस्के,लता शेंद्रे, रेखा दिक्षित,सुरज गेडाम,मिलींद बी.खोब्रागडे,मधुकर दुफारे,ज्योत्स्ना बन्सोड,सुजाता अवचट,सुनिल चडगुलवार,खुशाल म्हशाखेत्री,शैला चिमड्यालवार इत्यादी कविंनी सहभाग नोंदविला होता.
पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार असल्याचे नाट्यश्रीचे संचालक तथा नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांनी कळविले आहे.
- Advertisement -

