- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-आपण नेहमी बघतो की,एखादा लाचखोर व्यक्ती लाच प्रकरणात दोषी आढळू नये; याकरीता शक्कल लढवून दुसऱ्यांच्या माध्यमातून लाच घेण्याचे दर्शवितो.त्यामध्ये मुख्य आरोपी तर सापडतोच,मात्र इतरही व्यक्ती त्यात गोवले जातात.असाच प्रकार वन विभागात उघडकीस आला.प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने लाच प्रकरणामधील आरोपी शेतकऱ्याची ठोस पुराव्यांअभावी निर्दोष सुटका केली.सिद्धार्थ लक्ष्मण गजघाटे असे आरोपीचे नाव असून,तो इंदापूर, ता. भिवापूर येथील रहिवासी आहे.तक्रारकर्ते किशोर शंभरकर यांनी वनामधून परवानगीशिवाय लाकडे आणली होती.त्यामुळे मुख्य आरोपी वनरक्षकाने त्यांच्याकडून सुरुवातीला एक हजार रुपयाची लाच घेतली व त्यानंतर परत १५०० रुपयांची मागणी केली. दरम्यान,वनरक्षकाच्या सांगण्यावरून गजघाटेने ती रक्कम स्वीकारली.त्यामुळे ३० जून २००६ रोजी विशेष सत्र न्यायालयाने त्याला एक वर्ष सश्रम कारावास व ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.त्या निर्णयाविरुद्ध गजघाटेने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.गजघाटेतर्फे ॲड.अनुप डांगोरे यांनी बाजू मांडली.त्यांनी संबंधित रक्कम लाचेची होती, याची माहिती गजघाटेला नव्हती,हे सिद्ध केले.
- Advertisement -

