Monday, September 7, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआमचा फेव्हिकॉलचा जोड आहे,तो तुटणार नाही; अफवा पसरविणाऱ्या बातम्या- वडेट्टीवार

आमचा फेव्हिकॉलचा जोड आहे,तो तुटणार नाही; अफवा पसरविणाऱ्या बातम्या- वडेट्टीवार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाविकास आघाडीत जागावाटपाच्या मुद्यावर निर्माण झालेल्या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे व खासदार संजय राऊत यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहांशी फोनवरून संवाद साधल्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही चर्चा रंगल्यामुळे विरोधकांच्या गोटात खळबळ माजली आहे.त्यामुळे स्थितीचे गांभीर्य ओळखून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व स्वतः संजय राऊत यांनी पुढे येत ही बातमी पेरण्यात आल्याचा दावा केला आहे.
महाविकास आघाडीत काँग्रेस व ठाकरे गटात जागावाटपावरून वाद निर्माण झाला आहे.काँग्रेस ठाकरे गटाला हव्या त्या जागा देण्यास तयार नाही. विशेषतः काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भूमिकाही अनेकांना मान्य नाही.त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी कंटाळून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची व संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांशी फोनवरून चर्चा केल्याचा दावा ‘एबीपी माझा’
या मराठी वृत्तवाहिनीने हा दावा केला आहे.
या दाव्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली.त्यानंतर कांग्रेसने तात्काळ पुढाकार घेत हे वृत्त फेटाळून लावत महाविकास आघाडी अभेद्य असल्याचे स्पष्ट केले.सदर बातमी १ टक्काही खरी नाही.काँग्रेस व ठाकरे गटात तणाव वाढवण्यासाठी भाजपने या बातम्या पेरल्या आहेत.पण आमचा फेव्हिकॉलचा जोड आहे,तो तुटणार नाही;असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्यात कोणतीही भेट झाली नाही. भाजपकडून आमच्यात वाद निर्माण करण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरू आहे.कारण, भाजपची प्रचंड घाबरगुंडी उडाली आहे.संजय राऊत यांना तुरुंगात कुणी पाठवले? त्यामुळे अशी कोणतीही चर्चा झाली नाही हे लक्षात घेतले पाहिजे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष महाविकास आघाडी बरोबर आहे.संजय राऊत व अमित शहांतील कथित चर्चेवरही आमची हायकमांडशी कोणतीही चर्चा झाली नाही.आमच्यातील जागावाटपाचा पेच जवळपास संपला आहे. मंगळवारपर्यंत सर्वकाही सुरुळीत होईल,असेही वडेट्टीवार यावेळी बोलताना म्हणाले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माजी सरपंचांनाच प्रशासक म्हणून कायम ठेवण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींवर तत्कालीन सरपंच हे प्रशासक म्हणून नेमण्यात आले होते.अश्यातच माजी सरपंचांच्या सहा महिन्यांच्या काही प्रशासक पदाची...

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!