- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-तलाव व नद्यांचे वाढते आकर्षण शहरी तरुणांसाठी जीवघेणे ठरू लागले आहे.शिक्षणासह नोकरी करणारे पाच तरुण सुट्टी असल्याने काल,शनिवार २६ जुलै रोजी सकाळच्या सुमारास हिंगणा शहरापासून १० किलोमिटर अंतरावर असलेल्या सालईमेंढा शिवारातील तलावाच्या काठी फिरायला गेले होते. परिसरात काही वेळ फेरफटका मारल्यानंतर पाच पैकी चौघे पोहण्यासाठी तलावात उतरले.खोल पाण्यात गेल्याने यातील एक जण व त्याचा मित्र गटांगळ्या खाऊ लागले.उर्वरित दोघांनी एकाला पकडून तलावातून बाहेर काढले.मात्र,यात २० वर्षीय तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाला.पीयूष सूरज सुखदेवे वय २० वर्षे,रा.भिलगाव,ता.कामठी असे तलावात बुडून मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. पीयूष व त्याचे मित्र मृणाल विमेश उके वय २० वर्षे, हर्ष सिद्धार्थ थुलकर वय १९ वर्षे दोघेही रा. कपिलनगर,नागपूर,करण लक्ष्मण चौधरी वय १८ वर्षे, रा.बाराखोली,जरीपटका,नागपूर व क्रिश प्रकाश स्वामी वय १९ वर्षे, रा.रेल्वे क्वार्टर,मोतीबाग,नागपूर हे पाचही मित्र फिरायला गेले होते.पीयूष तलावात बुडताच घाबरलेल्या मित्रांनी लगेच पोलिसांना सूचना दिली.ठाणेदार जितेंद्र बोबडे व सहकारी पोलिसांनी पीयूषचा शोध घेण्यासाठी स्थानिक तरुणांची मदत घेतली.मात्र,पियूषचा मृतदेह सापडत नसल्याने त्यांनी
नागपूर महानगरपालिका व हिंगणा तालुक्याच्या वानाडोंगरी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले.त्यांनी बोटीद्वारे पीयूषचा पाण्यात शोध घेत पाच तासांनी मृतदेह बाहेर काढला.यावेळी पीयूषचे वडील सूरज सुखदेवे,मामा अमर तागडे व नातेवाईक घटनास्थळी उपस्थित होते.पियूषचा मृतदेह पाहून एकच आक्रोश केला. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.हिंगणा तालुक्यातील मोहगाव (झिल्पी) व सालईमेंढा तलाव धोकादायक ठरत असल्याने तलावात कुणीही उतरू नये,अश्या सूचनांचे जागोजागी फलक लावले आहेत. मात्र,तरुण मंडळी या सूचनांकडे दुर्लक्ष करतात आणि अमूल्य जीवन नष्ट करतात.
- Advertisement -

