Saturday, June 20, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्त१०० शाळांना भेटी देणे उपक्रम.. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा गुलाबपुष्प...

१०० शाळांना भेटी देणे उपक्रम.. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा गुलाबपुष्प देऊन आमदार,खासदार करणार स्वागत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध जिल्ह्यातील ‘१०० शाळांना भेटी देणे’ या शासनाच्या उपक्रमाच्या अनुषंगाने लोकप्रतिनिधींसह वर्ग-१ व २ च्या अधिकाऱ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी मतदारसंघातील किंवा जवळच्या एका शाळेला भेट देण्याचे सूचित केले आहे.शाळांमधील कामकाजाचा शैक्षणिक गुणवत्तेचा तसेच इतर सोयी सुविधांचा आढावा घेण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार शिक्षण विभागाने लोकप्रतिनिधींच्या भेटीची यादी तयार केली आहे तसे निमंत्रण लोकप्रतिनिधींना दिले जाणार आहे. ‘१०० शाळांना भेटी देणे’ असे उपक्रमाला नाव देण्यात आले आहे.पहिल्या दिवशी लोकप्रतिनिधींनी मतदारसंघातील किंवा नजीकच्या शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत,सोयीसुविधा व गुणवत्तेचा आढावा घ्यावा,असे सूचित करण्यात आले आहे.त्यानुसार जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांनी नियोजन केले आहे.यात आमदार,खासदार,जिल्हा परिषद अध्यक्ष,उपाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य भेट देतील.विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यासोबतच यावर्षी प्रथमच शासनाने लोकप्रतिनिधी आणि वर्ग-१ व २ च्या अधिकाऱ्यांना भेट देण्याचा निर्णय घेतला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तीन तिघडा अन् काम बिघडा..! वन परिक्षेत्र अधिकारी,वनरक्षक व खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त गडचिरोली :-अनेकांना वाटतेय की,एखाद्या तिसऱ्याच व्यक्तींच्या माध्यमातून पैश्याची रक्कम घेतली,तर आपले नाव वा आपली करणी उजेडात येणार नाही.पण,लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तसला...

गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे लक्षणीय पाणीसाठा निर्माण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मागील दोन वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.या कामांमुळे जिल्ह्यात लक्षणीय पाणीसाठा निर्माण झाला असून...

आता भाडेपट्ट्यावरील शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखात असणार ‘महाराष्ट्र शासन’ कब्जेदार..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भाडेपट्ट्याने प्रदान करण्यात आलेल्या शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखातील नोंदी अधिक अचूक,पारदर्शक आणि एकसमान करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री...

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!